शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सौदीनं मैत्री निभावली, भारतीयांना मिळाली 'ही' मोठी सूट; भारतानं दिली प्रतिक्रिया…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 15:41 IST

सौदी अरेबिया सरकारने भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबिया सरकारने भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय नागरिकांना सौदी अरेबियाला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची गरज भासणार नाही. नवी दिल्लीतील सौदी अरेबियाच्या दूतावासानुसार, सौदी अरेबियाला भेट देण्यासाठी व्हिसा मिळवताना कोणत्याही व्यक्तीला पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही.

सौदी अरेबियाच्या दूतावासाने यासंदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध आणि धोरणात्मक भागीदारी लक्षात घेऊन ज्भारतीय नागरिकांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सादर करण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यात नमूद करण्यात आलेय. त्याच वेळी, निवेदनात, सौदी अरेबियामध्ये शांततामय वातावरणात वास्तव्यास असलेल्या 20 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या योगदानाचेही दूतावासाने कौतुक केले आहे.

भारताकडूनही प्रतिक्रियासौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत केले आहे. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने या निर्णयाबद्दल सौदी सरकारचे आभार मानले आहेत. सौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयामुळे त्या ठिकाणी राहणार्‍या 20 लाखांहून अधिक भारतीय लोकांना दिलासा मिळणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले.

भारतीयांना दिलासावास्तविक, कोणत्याही देशाचा व्हिसा मिळणे हे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर तपास केला जातो आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हिसा दिला जातो. अशा परिस्थितीत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हाही याच प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे लोकांचा वेळही वाया जातो. मात्र कडक नियमांमुळे ते जमा करावे लागते. मात्र, आता सौदी सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारत