शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सौदीनं मैत्री निभावली, भारतीयांना मिळाली 'ही' मोठी सूट; भारतानं दिली प्रतिक्रिया…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 15:41 IST

सौदी अरेबिया सरकारने भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबिया सरकारने भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय नागरिकांना सौदी अरेबियाला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची गरज भासणार नाही. नवी दिल्लीतील सौदी अरेबियाच्या दूतावासानुसार, सौदी अरेबियाला भेट देण्यासाठी व्हिसा मिळवताना कोणत्याही व्यक्तीला पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही.

सौदी अरेबियाच्या दूतावासाने यासंदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध आणि धोरणात्मक भागीदारी लक्षात घेऊन ज्भारतीय नागरिकांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सादर करण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यात नमूद करण्यात आलेय. त्याच वेळी, निवेदनात, सौदी अरेबियामध्ये शांततामय वातावरणात वास्तव्यास असलेल्या 20 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या योगदानाचेही दूतावासाने कौतुक केले आहे.

भारताकडूनही प्रतिक्रियासौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत केले आहे. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने या निर्णयाबद्दल सौदी सरकारचे आभार मानले आहेत. सौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयामुळे त्या ठिकाणी राहणार्‍या 20 लाखांहून अधिक भारतीय लोकांना दिलासा मिळणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले.

भारतीयांना दिलासावास्तविक, कोणत्याही देशाचा व्हिसा मिळणे हे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर तपास केला जातो आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हिसा दिला जातो. अशा परिस्थितीत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हाही याच प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे लोकांचा वेळही वाया जातो. मात्र कडक नियमांमुळे ते जमा करावे लागते. मात्र, आता सौदी सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारत