शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

Russsia-Ukraine War: बायकोमुळं यूक्रेन सोडण्यास भारतीय व्यक्तीनं दिला नकार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 09:58 IST

यूक्रेनमध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर २ दिवसांनी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा हाती घेतले.

कीव – रशियानं यूक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली. त्यामुळे जगभरात त्याचे पडसाद उमटत आहे. यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाकडून मिसाइल हल्ले सुरू आहेत. आतापर्यंत या युद्धात हजारो जवान आणि सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. रशिया-यूक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. यूक्रेनमध्ये १८ हजाराहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्य करतात. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना यूक्रेनमधून मायदेशी आणण्याचं मिशन हाती घेण्यात आले आहे.

त्यातच एका भारतीय नागरिकाने मायदेशी परतण्यास नकार दिला आहे. यूक्रेनच्या युद्धात सामान्य नागरिकांचाही बळी जात आहे. भारतीयांच्या सुरक्षतेसाठी केंद्र सरकार प्राधान्य देत आहे. आतापर्यंत अनेक भारतीय मायदेशी परतले आहेत. परंतु यूक्रेनमधील वाढता धोका पाहताही या व्यक्तीनं यूक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. या व्यक्तीचं यूक्रेन न सोडण्यामागचं कारण ऐकून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या तो यूक्रेनमधील एका मित्राच्या घरी राहत आहे.

यूक्रेनमध्ये अडकलेल्या या भारतीय नागरिकाची पत्नी गर्भवती आहे. परंतु ती भारतीय नागरीक नाही. त्यामुळे तिला भारतात आणलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच या व्यक्तीने पत्नीला एकटं सोडून भारतात येण्यास नकार दिला आहे. यूक्रेनची राजधानी कीवमधील हल्ल्यानंतर सुरक्षित स्थानावर पोहचलेल्या गगनं न्यूज एजन्सीची संवाद साधला. तो म्हणाला की, मी माझं कुटुंब आणि ८ महिन्याची गर्भवती पत्नीला यूक्रेनमध्ये सोडून परत येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे आता पोलंडला जात आहोत. सध्या तो लविवमध्ये एका मित्राच्या घरी थांबल्याचं सांगितले.

भारतीयांची शेकडो मैल पायपीट

यूक्रेनमध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर २ दिवसांनी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा हाती घेतले. यूक्रेनच्या सरकारनं नागरिकांच्या फ्लाइट्ससाठी एअरस्पेस बंद केले. त्यामुळे भारतीय नागरिकांना पोलँड, रोमानिया, स्लोवाकिया, हंगरी आणि मोल्दोवासारख्या देशांपर्यंत पोहचण्यासाठी पायपीट करावी लागली. जेणेकरून त्याठिकाणाहून विमानाद्वारे भारतात पोहचता येईल.

मदतीसाठी केंद्राचे ४ मंत्री यूक्रेनच्या सीमेवर

यूक्रेनच्या शेजारील देशात असणाऱ्या भारतीय दूतावासांनी युद्धग्रस्त परिसरातून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यूक्रेनच्या सीमांवर चौकी उभारली आहे. एअर इंडिया आणि इंडियन एअरफोर्सच्या विमानांद्वारे भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, हरदीप सिंह पुरी, वी. के सिंह आणि किरेन रिजिजू यूक्रेनच्या सीमेवर समन्वयासाठी हजर आहेत.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ७६ फ्लाईट्समधून यूक्रेनमध्ये अडकलेले १५ हजार ९२० भारतीयांना सुखरुप भारतात आणलं आहे. शनिवारी आणि रविवारी १३ फ्लाइट्स नवी दिल्ली आणि मुंबई येथे पोहचल्या. त्यात अडीच हजार लोकं उपस्थित होते. रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. तर १ विद्यार्थी गोळी लागल्याने जखमी झाला आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया