शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा

By देवेश फडके | Published: February 11, 2021 3:14 PM

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. 

ठळक मुद्देआता रशियातील वृत्तसंस्थेचा दावागलवान खोऱ्यातील झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेलेभारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याची माहिती

मॉस्को : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरून सुरू असलेला तणाव आता निवळेल, असे म्हटले जात आहे. कारण, भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (गुरुवार) राज्यसभेत सांगितले. यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने गतवर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेले होते, असा दावा केला आहे. (russian news agency claims that china lost 45 soldiers during galwan valley clashes with india)

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांचे सुमारे ५० हजार सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले होते. भारत आणि चीन यांच्यातील सैन्य स्तरीय चर्चा सुरू झाल्यानंतर चीनने गलवान खोऱ्यातील झटापटीत पाच सैनिक मारले गेले होते, असे कबूल केले होते. मात्र, अमेरिका आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार, गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत चीनचे किमान ४० सैनिक मारले गेले होते. यानंतर आता रशियाच्या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानंतर पुन्हा हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावrussiaरशिया