शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Russia Ukraine War : युक्रेनहून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी कीव्हला पाठवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 10:16 IST

Russia Ukraine War : केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - युक्रेनमधील खारकीव्ह येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. यानंतर आता युक्रेनहून परतणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी कीव्हला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. युद्धादरम्यान, हे सगळं होत असल्याचंही मंत्री म्हणाले आहेत. तसेच आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असंही व्ही के सिंह यांनी म्हटलं आहे. 

"...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

नवीनच्या मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने सांगितलं. एनडीटीव्हीला त्याने ही माहिती दिली आहे. जीवनावश्यक सामान आणि खाण्यासाठी अन्न पदार्थ संपल्याने नवीनला चिंता लागून राहिली होती. त्यामुळेच तो बाहेर पडला. जर तो यासाठी गेला नसता तर आज जिवंत असता असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"नवीन घराबाहेर पडला त्यावेळी आम्ही झोपलो होतो. खाण्यासाठी काहीतरी अन्नपदार्थ घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आम्ही खरंतर खूप भूकेलो होतो. घटनेच्या आधीच्या रात्रीदेखील आम्ही उपाशीपोटी झोपलो होतो. आम्ही अन्नासाठी घराबाहेर पडलो असतो, पण संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आलेला होता. घराबाहेर पडण्यास मनाई होती. तरीही आम्हाला काहीतरी अन्न मिळावं या आशेने नवीन घराबाहेर पडला होता. मी नवीनला सकाळी आठ वाजता फोन केला. त्यावेळी त्याने आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आल्याचं सांगितलं. त्याने मला काही पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर मी पैसे ट्रान्सफर केले आणि त्याला तातडीने लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानेही आपण लगेच येतो असं सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं" असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत