शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ

By बाळकृष्ण परब | Updated: September 26, 2020 09:49 IST

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्दे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा गायले काश्मीरचे रडगाणे भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून केले वॉकआऊट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करणार

संयुक्त राष्ट्रे - संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचे रडगाणे गायले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. तसेच गांधी-नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडचिठ्ठी देऊन भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आरएसएसकडून सुरू आहे, दावा इम्रान खानने केला. दरम्यान, इम्रानने भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केल्यावर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून वॉकआऊट केले.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या धोक्यामुळे यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे आयोजन व्हर्चुअल पद्धतीने होत आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणास उभे राहिल्यापासून इम्रान खान यांनी भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न उपस्थित केला. सोबतच भारतातील राजकीय परिस्थितीतवरीही आक्षेपार्ह विधान केले. सध्या भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधी आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडून दिले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला.इम्रान खान यांनी केलेल्या या भाषणावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी सांगितले की. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य हे कुटनीतिक दृष्टीने खालच्या पातळीवरील होते. इम्रान खान यांच्या भाषणामध्ये खोटारडेपणा, वैयक्तिक आरोप आणि आपल्याकडील अल्पसंख्याकांची परिस्थिती न पाहता भारतावर टीका करण्याचा समावेश होता. याचं उत्तर राइट टू रिप्लायच्या माध्यमातून दिलं जाईल.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार आज २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संबोधनातील पहिले वक्ते असतील. स्थानिक वेळेनुसार सकाली ९ वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता मोदींच्या संबोधनास सुरुवात होईल.

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्वMahatma Gandhiमहात्मा गांधी