शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ

By बाळकृष्ण परब | Updated: September 26, 2020 09:49 IST

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्दे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा गायले काश्मीरचे रडगाणे भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून केले वॉकआऊट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करणार

संयुक्त राष्ट्रे - संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचे रडगाणे गायले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. तसेच गांधी-नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडचिठ्ठी देऊन भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आरएसएसकडून सुरू आहे, दावा इम्रान खानने केला. दरम्यान, इम्रानने भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केल्यावर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून वॉकआऊट केले.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या धोक्यामुळे यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे आयोजन व्हर्चुअल पद्धतीने होत आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणास उभे राहिल्यापासून इम्रान खान यांनी भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न उपस्थित केला. सोबतच भारतातील राजकीय परिस्थितीतवरीही आक्षेपार्ह विधान केले. सध्या भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधी आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडून दिले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला.इम्रान खान यांनी केलेल्या या भाषणावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी सांगितले की. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य हे कुटनीतिक दृष्टीने खालच्या पातळीवरील होते. इम्रान खान यांच्या भाषणामध्ये खोटारडेपणा, वैयक्तिक आरोप आणि आपल्याकडील अल्पसंख्याकांची परिस्थिती न पाहता भारतावर टीका करण्याचा समावेश होता. याचं उत्तर राइट टू रिप्लायच्या माध्यमातून दिलं जाईल.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार आज २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संबोधनातील पहिले वक्ते असतील. स्थानिक वेळेनुसार सकाली ९ वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता मोदींच्या संबोधनास सुरुवात होईल.

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्वMahatma Gandhiमहात्मा गांधी