शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

22 जानेवारीपासून रोहिंग्यांना माघारी पाठवण्याच्या योजनेला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 12:16 IST

बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे.  

ठळक मुद्देराखिन प्रांताच्या वायव्य भागात ताउंगप्योलेवेइ येथे बांगलादेशातून येणाऱ्या लोकांसाठी छावणी उभी करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जुलैपासून 6 लाख लोकांनी राखिन प्रांत सोडून पलायन केले आहे. त्यातील बहुतांश लोक रोहिंग्या मुस्लीम होते.

रंगून- म्यानमारमधून बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे.  म्यानमारची राजधानी न्या पि डॉं येथे म्यानमार सरकार आणि म्यानमार मानवाधिकार आयोगाच्या बैठकीनंतर मंत्री विन यांनी ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 450 हिंदूंना परत म्यानमारमध्ये आणले जाणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जाळपोळ, दंगल, हत्या आणि गुन्ह्यांच्या सत्रामध्ये रोहिंग्याबरोबर हिंदू आणि इतर समुदायांचे लोकही राखिन प्रांत सोडून निघून गेले होते. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जुलैपासून 6 लाख लोकांनी राखिन प्रांत सोडून पलायन केले आहे. त्यातील बहुतांश लोक रोहिंग्या मुस्लीम होते. रोहिंग्यांच्या प्रत्यावर्तनासाठी बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे.राखिन प्रांताच्या वायव्य भागात ताउंगप्योलेवेइ येथे बांगलादेशातून येणाऱ्या लोकांसाठी छावणी उभी करण्यात आली आहे. रस्ते मार्गाने येणाऱ्या निर्वासितांना तेथे आणण्यात येईल तर न्गाखुया, मंगडौ येथे समुद्र आणि इतर जलमार्गाने येणाऱ्या रोहिंग्यांना आणण्यात येइल.

रोहिंग्यांनी स्थलांतर केले होते ?बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांप्रमाणेच दोन वर्षांपुर्वी त्रास वाचविण्यासाठी हजारो रोहिंग्या मुसलमानांनी मिळेल त्या बोटींनी म्यानमारचा किनारा सोडला होता. थायलंड, इंडोनेशिया अशा कोणत्याही दिशांना त्यांच्या बोटी गेल्या. दोन तीन महिन्यांहून अधिक काळ बोटींवर काढल्यानंतर काहींच्या बोटी थायलंडच्या किनाऱ्याला लागल्या. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये ठेवले गेल. मात्र अजूनही शेकडो रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया आसरा देईल अशा अपेक्षेत फिरतच आहेत. या बोटी म्हणजे बंगालच्या उपसागरात तरंगणाऱ्या शवपेट्याच झाल्या आहेत. हे गरिब लोक कोणालाच नको आहेत. शांततेचे नोबेल मिळविणाऱ्या आंग सान सू की यांनीही या प्रश्नावर मौन धारण केले आहे. बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च गुरु दलाई लामा यांनीही यामध्ये हस्तक्षेप करुन हा प्रश्न सोडावावा अशी विनंती केली होती, मात्र तरिही म्यानमारने यावर ठोस भूमिका घेतली नाही. सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिने प्रांतात यांची सर्वात जास्त वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली आहेत. स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे. २०१२ साली दोन्ही वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि सुमारे एक लाख चाळीस हजार नागरिकांना घरे सोडावी लागली.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याMyanmarम्यानमारInternationalआंतरराष्ट्रीय