शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:35 IST

या भिकाऱ्याचं सापडणं त्या कुटूंबासाठी फार महत्त्वाचं झालं आहे आणि सर्व त्याचा कसून शोध घेत आहेत.

ठळक मुद्देउत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा प्रकार घडलाय. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा.

हरिद्वार -  नशिबात असेल तर एखादा भिकारी एका रात्रीत लखपती बनू शकतो. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हरिद्वारमध्ये घडलेली घटना तुम्ही ऐेकायलाच हवी. हरिद्वार येथे एक भिकारी एका रात्रीत तब्बल ४० लाखांचा मालक बनलाय. यासाठी त्याने खूप परिश्रम केले वगैरे अशातला भाग नाही किंवा त्याला लॉटरी लागली आहे, अशातलाही भाग नाही. पण तरीही तो लखपती बनला आहे.

आणखी वाचा - पोलिसांना पुशअप्स मारताना पाहून कुत्र्यालाही राहवलं नाही

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा चमत्कार घडलाय. इथल्या एका इसमाने कनखल येथील एका भजन मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याला एक जुनी गादी देऊ केली. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. या गादीमध्ये तब्बल ४० लाख होते. आपल्या आयुष्याची जमापूंजी साठवून त्यांनी या गादीत हे पैसे लपवून ठेवले होते. मात्र त्यांच्या मुलाने जुनी गादी समजून ती गादी भिकाऱ्याला देऊ केली. त्यामुळे साहजिकच हे कुटुंब आता त्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा. मात्र ते त्या भिकाऱ्याच्या शोधात तिथे गेले असता त्यांना तो तिथे सापडला नाही. त्यांनी त्या परिसरात त्याला जंग-जंग पछाडलं. सगळीकडे चौकशी केली, मात्र तो काही सापडला नाही.

आणखी वाचा - अजब ! फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांनी गाढवांनाच केली अटक, चार दिवस कारागृहात ठेवलं डांबून

शेवटी तीन दिवसांनंतर तिथे तो भिकारी अखेर सापडला. आता आपले ४० लाख परत मिळणार या आशेने ते कुटुंब त्या भिकाऱ्याकडे गेलं. पण त्यांचा तिथं पुन्हा हिरमोड झाला. त्या भिकाऱ्याने ती गादी काही रुपयांत दुसऱ्या भिकाऱ्याला विकली होती. झाली की नाही पंचाईत. आता हे कुटुंब त्या दुसऱ्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. याविषयी त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनाही या भिकाऱ्याबद्दल काहीच माहित नाही. त्यामुळे आता ४०लाखासाठी त्या नव्या भिकाऱ्याला शोधण्याचं खूप मोठं आव्हान या कुटुंबाकडे आहे. पण ज्या इसमाला हे ४० लाख सापडले आहेत, त्या इसमाचं आयुष्यच नक्कीच पालटलं असेल, यात काहीच शंका नाही. आहे की नाही रंजक घटना. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी लोक लॉटरी वगैरे काढतात. पण ध्यानीमनी नसतानाही जर कोणाला अशी लॉटरी लागली तर आश्चर्यच वाटेल ना.

सौजन्य - http://medianp.net

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत