शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:30 IST

भारताने करार स्थगित केल्यापासून, पाकिस्तानने जलसंपदा मंत्रालयामार्फत भारत सरकारला चार पत्रं लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होत असून देश पाण्याच्या तीव्र टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अडचणींमध्ये या निर्णयामुळे भर पडली आहे.

पाकिस्तानकडून भारताला सलग चार पत्रंभारताने करार स्थगित केल्यापासून, पाकिस्तानने जलसंपदा मंत्रालयामार्फत भारत सरकारला चार पत्रं लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या पत्रांमध्ये पाकिस्तानने वाटाघाटीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. भारताच्या जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेल्या या पत्रांमध्ये, रब्बी हंगामातील पीक उत्पन्न धोक्यात येण्याची भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे.

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी स्पष्टपणे म्हटले आहे की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” भारत सरकारने पाकिस्तानकडून सातत्याने चालणाऱ्या दहशतवादाच्या पाठबळाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

जलवाहिन्यांचा पुनर्विकास सुरूभारत सरकार सध्या पाकिस्तानकडे जाणारे पाणी देशाच्या आतल्या भागात वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये १२ किमी लांबीचा बोगदा, १२० ते १३० किमी लांबीचे कालवे, यांचा समावेश आहे. हे पाणी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये वळवण्याचे नियोजन आहे. हे पाणी रावी कालवा प्रकल्प, इंदिरा गांधी कालवा, बिकानेर कालवा, आणि गँग कालवा यामार्फत या राज्यांपर्यंत नेण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची ठाम भूमिकाविदेशी दौऱ्यावर गेलेल्या भारतीय शिष्टमंडळांकडेही सिंधू पाणी करारासंबंधी प्रश्न विचारले गेले, त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की, “जोपर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादाला आश्रय देत राहील, तोपर्यंत या करारावर कोणतीही सहानुभूती दर्शवली जाणार नाही.”

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर