पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. दरम्यान, पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. आता पाकिस्तान परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी नूर खान एअरबेसवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. उपग्रह फोटोद्वारे हे उघड झाले.
नवीनत उपग्रह फोटोवरून नूर खान एअरबेसवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. इस्लामाबादपासून २५ किमी पेक्षा कमी अंतरावर असलेले नूर खान एअरबेस हे पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रमुख सुविधा आणि सामरिक उपकरणांचे मुख्य तळ आहे.
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान नूर खान एअरबेसचे नुकसान
१० मे २०२५ रोजी भारताने क्षेपणास्त्राने हल्ला केला. पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा ते रोखण्यात अपयशी ठरली. या हल्ल्यात एअरबेसचे बरेच नुकसान झाले आणि एक ड्रोन कमांड सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केला
भारताने हल्ल्यात कोणत्या क्षेपणास्त्रांचा वापर केला याची पुष्टी कधीही केलेली नसली तरी, नूर खान येथील तळ ब्राह्मोस किंवा SCALP हवेतून सोडलेल्या जमिनीवरील हल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी किंवा दोन्हीने नष्ट केला असण्याची दाट शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, ब्रह्मोस भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० लढाऊ विमानांनी सोडण्यात आला, तर SCALP राफेल विमानांनी सोडण्यात आला.
ज्या सुविधेवर हल्ला झाला त्या ठिकाणी हल्ल्यापूर्वी दोन्ही बाजूला छत असलेले दोन ट्रॅक्टर-ट्रेलर ट्रक उभे होते, असे नवीन आणि जुन्या फोटोंची तुलना केल्यास असे दिसून येते. १० मे २०२५ रोजीच्या फोटोतून हल्ल्यात दोन्ही ट्रक उद्ध्वस्त झाले होते आणि जवळच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे.