शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाराच्या फायद्यासाठी चीनचा रोहिंग्यांना विरोध, म्यानमारला समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:50 IST

भारतापाठोपाठ आता चीननंही रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर म्यानमारला आपलं समर्थन दर्शवले आहे. भारताने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न नजरेसमोर ठेऊन आपली भूमिका मांडली तर चीनला आपला व्यापार सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

नवी दिल्ली -  भारतापाठोपाठ आता चीननंही रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर म्यानमारला आपलं समर्थन दर्शवले आहे. भारताने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न नजरेसमोर ठेऊन आपली भूमिका मांडली तर चीनला आपला व्यापार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. रोहिंग्यांच्या मुद्यावर म्यानमारला समर्थन देणा-या चीनला, रोहिंग्या ही एक जागतिक समस्या होऊ नये, असे वाटत आहे. दरम्यान, म्यानमारला समर्थन देण्यामागे चीनचा स्वतःचा व्यावसायिक हेतू आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारमधील हिंसाचारग्रस्त राखीन प्रांतात चीननं पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांवर जवळपास 7.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. याच राखीन प्रांतात सर्वाधिक हिंसा सुरू आहे. ऑगस्टमध्ये या प्रांतातील हिंसाचारात वाढ झाल्यानं मोठ्या संख्येनं रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारील देश बांगलादेशात पलायन केले.

दरम्यान,  सिंगापूर येथील राजारथनम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज (RSIS) मधील चायनीज प्रोग्रॅमचे असोसिएट रिसर्च फेलो आयरिनी चेन यांनी सांगितले की, चीन राखीन प्रांतात जवळपास 7.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. या प्रांतात एक औद्योगिक पार्क आणि स्पेशल इकोनॉमिक झोनदेखील विकसित करण्याची चीनची योजना आहे. या पार्श्वभूमीवर चीनसाठी ही गुंतवणूक मानवी समस्यांहून अधिक महत्त्वाची आहे. 

राखीनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच - पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्यानमारच्या राखीन राज्यातील ‘दहशतवाद्यांचा हिंसाचार’ काळजी करण्यासारखा असल्याची म्यानमारची चिंता योग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. म्यानमारचे ऐक्य आणि भौगोलिक एकात्मता अबाधित ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या प्रमुख आँग सान सू की यांच्याशी म्यानमार दौ-यादरम्यान बोलताना केले होते.

रोहिंग्यांचा प्रश्न नक्की आहे तरी काय ? 2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध राखीन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील, अशी भीती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशीररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरूच आहे.