शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:54 IST

चीनमधील एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका कमकुवत करू शकणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

Rajnath Singh at Shanghai Cooperation Organisation: शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पाकिस्तान आणि चीनसह संपूर्ण जगाला दहशतवादावर कडक इशारा देताना मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्यांना हल्ल्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. निवेदनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख नसल्याने त्यावर सही करण्यास राजनाथ सिंह यांनी नकार दिला.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या चीनमध्ये आहेत. गुरुवारी त्यांनी एससीओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नसल्याने बैठकीच्या संयुक्त निवेदनावर राजनाथ सिंह यांनी सही केली नाही. हे संयुक्त निवेदन दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका दर्शवत नसल्याचे सांगण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे या निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख होता आणि भारतावर अशांतता निर्माण करण्याचा आरोप होता. या बैठकीद्वारे चीन आणि पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र राजनाथ सिंह यांनी बरोबर ओळखून निवदेनावर सही केली नाही.

दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कमकुवत झाली असती म्हणून राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदन असलेल्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे म्हटलं जात आहे. चीन आणि पाकिस्तानने त्यांच्या प्रभावाने हे निवेदन तयार केल्याचे बोललं जात आहे. चीनने एससीओ शिखर परिषदेचे आयोजन केलं आबे. कोणत्याही निवेदनाचा मसुदा तयार करण्यात यजमान देशाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पाकिस्तानवरील प्रेमापोटी चीन दहशतवादाचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होता, जो राजनाथ सिंह यांनी एका क्षणात पकडला.

"दहशतवादासाठी वित्तपुरवठा करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्याविरुद्ध लढताना कोणतेही दुहेरी निकष नसावेत. काही देश दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी सीमापार दहशतवादाचा धोरणात्मक साधन म्हणून वापर करत आहेत. आमच्या प्रदेशातील सर्वात मोठी आव्हाने शांतता, सुरक्षितता आणि विश्वासाचा अभाव आहे आणि या समस्यांचे मूळ कारणे म्हणजे वाढता कट्टरतावाद, अतिरेकीवाद आणि दहशतवाद आहे. शांतता, समृद्धी आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाहीत," असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद