शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:54 IST

चीनमधील एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका कमकुवत करू शकणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

Rajnath Singh at Shanghai Cooperation Organisation: शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पाकिस्तान आणि चीनसह संपूर्ण जगाला दहशतवादावर कडक इशारा देताना मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्यांना हल्ल्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. निवेदनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख नसल्याने त्यावर सही करण्यास राजनाथ सिंह यांनी नकार दिला.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या चीनमध्ये आहेत. गुरुवारी त्यांनी एससीओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नसल्याने बैठकीच्या संयुक्त निवेदनावर राजनाथ सिंह यांनी सही केली नाही. हे संयुक्त निवेदन दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका दर्शवत नसल्याचे सांगण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे या निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख होता आणि भारतावर अशांतता निर्माण करण्याचा आरोप होता. या बैठकीद्वारे चीन आणि पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र राजनाथ सिंह यांनी बरोबर ओळखून निवदेनावर सही केली नाही.

दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कमकुवत झाली असती म्हणून राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदन असलेल्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे म्हटलं जात आहे. चीन आणि पाकिस्तानने त्यांच्या प्रभावाने हे निवेदन तयार केल्याचे बोललं जात आहे. चीनने एससीओ शिखर परिषदेचे आयोजन केलं आबे. कोणत्याही निवेदनाचा मसुदा तयार करण्यात यजमान देशाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पाकिस्तानवरील प्रेमापोटी चीन दहशतवादाचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होता, जो राजनाथ सिंह यांनी एका क्षणात पकडला.

"दहशतवादासाठी वित्तपुरवठा करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्याविरुद्ध लढताना कोणतेही दुहेरी निकष नसावेत. काही देश दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी सीमापार दहशतवादाचा धोरणात्मक साधन म्हणून वापर करत आहेत. आमच्या प्रदेशातील सर्वात मोठी आव्हाने शांतता, सुरक्षितता आणि विश्वासाचा अभाव आहे आणि या समस्यांचे मूळ कारणे म्हणजे वाढता कट्टरतावाद, अतिरेकीवाद आणि दहशतवाद आहे. शांतता, समृद्धी आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाहीत," असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद