शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' माजी भारतीय नौसैनिकांचे पुढे काय होणार? तुरुंगातून सुटका होणार का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 20:47 IST

कतारने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

दोहा: कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांबाबत मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. नौदलाच्या या आठ माजी अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला कतारमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची दुबईत भेट घेतल्यानंतर हा निर्णय आला आहे. आता या 8 माजी नौसैनिकांचे पुढे काय होणार, त्यांची तुरुंगातून सुटका होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भारत आणि कतार यांच्यात विशेष करारभारत आणि कतार यांनी एका खास करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार भारत आणि कतार, एकमेकांच्या देशातील तुरुंगात कैद असलेल्या नागरिकांना त्यांची उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी मायदेशात पाठवू शकतात. भारत सरकारने या संदर्भात 2 डिसेंबर 2014 रोजी "भारत आणि कतार यांच्यातील दोषी व्यक्तींच्या हस्तांतरणावरील करार" नावाची एक प्रेस ब्रिफींगही जारी केली होती. अशा स्थितीत या आठ माजी भारतीय नौसैनिकांच्या बाबतीतही असेच घडण्याची शक्यता आहे.

भारताचा कोणत्या देशांसोबत असा करारभारत सरकारने आतापर्यंत युनायटेड किंगडम, मॉरिशस, बल्गेरिया, ब्राझील, कंबोडिया, इजिप्त, फ्रान्स, बांगलादेश, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, इराण, कुवेत, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, मालदीव, थायलंड, तुर्की, इटली, इस्रायल, रशिया , व्हिएतनाम , ऑस्ट्रेलियाने बोस्निया आणि हर्झेगोविना सरकारांशी करार केला आहे. याशिवाय कॅनडा, हाँगकाँग, नायजेरिया आणि स्पेनच्या सरकारांशीही चर्चा झाली आहे.

नेमका काय आरोप?ऑक्टोबर महिन्यामध्ये कतारमधील एका न्यायालयाने भारतीय नौदलामधील 8 माजी सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हे भारतीय माजी नौसैनिक कतारमध्ये राहून इस्राइलसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप कतारच्या प्रशानसाने ठेवला होता. तसेच त्यांना अटक केली होती. या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर भारत सरकारने या माजी नौसैनिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि राजेश, अशी यांची नावे आहेत. या सर्व माजी अधिकाऱ्यांनी 20 वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावली होती. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलQatarकतारIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीjailतुरुंग