शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:31 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बोलंदाजीवर राम गोपाल वर्मा यांचा षटकार

मुंबई: काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला. संवादानं प्रश्न सुटतात, असा सूर लावणाऱ्या खान यांना वर्मा यांनी सणसणीत उत्तर दिलं. संवादानं प्रश्न सुटले असते, तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता, असं ट्विट वर्मा यांनी केलं. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये इम्रान खान यांना टॅग केलं आहे. वर्मा यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. राम गोपाल वर्मा यांनी पाच ट्विट करत इम्रान खान यांना लक्ष्य केलं. 'समोरुन एक जण तुमच्या दिशेनं एक गाडी घेऊन येतो. ती आरडीएक्सनं भरलेली असते. त्या व्यक्तीशी आम्ही संवाद कसा साधायचा, हे खान यांनी शिकवावं. खान यांनी याबद्दल मार्गदर्शन केल्यास, आम्ही भारतीय त्यांना गुरुदक्षिणादेखील देऊ', असं म्हणत वर्मा यांनी खान यांना सणसणीत टोला लगावला. दहशतवादी कारवायांचे पुरावे मागणाऱ्या खान यांना वर्मा यांनी दुसऱ्या ट्विटमधून एक प्रश्नदेखील विचारला. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जर तुमच्या देशात ओसामा आहे, हे अमेरिकेला समजतं. पण तुमच्या स्वत:च्या देशाला कळत नाही. तर तुमचा देश खरंच तुमचा आहे?', असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला. पाकिस्तानातील सक्रीय दहशतवादी संघटनांवरुनदेखील वर्मा यांनी खान यांना खोचक शब्दांमध्ये लक्ष्य केलं. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा तुमचे प्ले स्टेशन्स नाहीत, असं मला कोणीच सांगितलं नाही. मात्र तुमचं त्या संघटनांवर प्रेम नाही, असं तुम्ही म्हटल्याचं मी कधीही ऐकलेलं नाही,' असा टोला वर्मा यांनी लगावला. वर्मा यांनी क्रिकेटच्या संज्ञा वापरुनदेखील चौफेर टोलेबाजी केली. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा हे तुमच्याच देशातले चेंडू आहेत, असं मी ऐकलं. हे चेंडू तुम्ही सीमेपार टोलवून भारताच्या पॅव्हेलियनमध्ये पाठवता. क्रिकेटचे चेंडू तुम्हाला बॉम्ब वाटतात का सर? कृपया मार्गदर्शन करा,' असं वर्मा यांनी म्हटलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांच्या सर्व ट्विट्सची सध्या सोशल मीडियात जबरदस्त चर्चा आहे. वर्मा यांनी त्यांच्या सर्व ट्विटमध्ये खान यांना टॅग केलं आहे. त्यामुळे आता या ट्विट्सना खान यांना काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुलवामातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. यानंतर भारतानं पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा केला आहे. याशिवाय अधिक आर्थितक निर्बंध लादण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खानRam Gopal Varmaराम गोपाल वर्माTerror Attackदहशतवादी हल्ला