शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:31 IST

या नियुक्तीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध आणखी बिघडतील असं ढाका येथील तज्ज्ञांचे मत आहे.

ढाका - बांगलादेशात लेफ्टिनंट जनरल अबु तैयब मोहम्मद जहीरूल आलम यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली जाऊ शकते. जहीरूल आलमवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हस्तक आणि भारताविरोधी भावना भडकवण्याचा आरोप आहे. त्यांचे नाव बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या भावाशीही जोडले गेले आहे ज्याच्यावर भारताच्या पूर्वोत्तर राज्यात कट्टरपंथी विचारांना समर्थन देण्याचा आरोप आहे. जहीरूल आलम यांच्या नियुक्तीने बांग्लादेश आणि भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकार जहीरूल आलम यांना हे पद देऊ शकते. जहीरूल आलम, जहांगीर आलम यांचे वर्गमित्र आहेत, जे सध्या बांगलादेशात गृह सल्लागार म्हणून काम करतात. जहीरूल आलम खालिदा जिया यांचा दिवंगत भाऊ सईद इस्कंदरचा निकटवर्तीय होता. ही सर्व माणसे पाकिस्तानशी जवळीक असलेली मानली जातात. जहांगीर आलम २००१-२००६ या कालावधीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी शासन काळात सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख होते. 

युनूस यांच्या खेळीनं भारताशी संबंध बिघडले

जहीरूल आलम यांचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. त्यांनी एकदा पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांना बांगलादेश नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये येण्याची परवानगी दिली होती. ते नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडेट राहिले आहेत. त्यानंतर त्यांना हमदर्द लॅबोरेटरीज बांगलादेश बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य बनवले गेले. जहीरूल आलम यांचे युनूस यांच्याशीही जवळचे संबंध आहेत. ते युनूस यांचे मूळगाव चटगावचे आहेत. त्यासाठी त्यांना बांगलादेशात डिफ्टी एनएसए बनवण्याची तयारी आहे. या नियुक्तीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध आणखी बिघडतील असं ढाका येथील तज्ज्ञांचे मत आहे.

आसाम, मिझारोम इथं कट्टरपंथींना दिली होती शस्त्रे

जहीरूल आलमचा निकटवर्तीय मेजर इस्कंदर हा खालिदा जियाचा छोटा भाऊ होता. तो २००१ ते २००६ या काळात बांगलादेशातील संसदेत खासदार होता. त्याशिवाय तो इस्लामिक टेलिविजनचा संस्थापक अध्यक्ष होता. त्याच्यावर भारताविरोधी आणि कट्टरपंथी ताकदींना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. इस्कंदरने २००१ साली बीएनपी निवडणुकीचा कारभार पाहिला होता. त्याचे २०१२ साली निधन झाले. इस्कंदरने मिझारोम, आसाम येथे कट्टरपंथींना शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यास मदत केल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानIndiaभारत