शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारणार; सौदी अरेबियाचे राजकुमार प्रयत्न करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:21 IST

दिल्लीच्या आधी पाकिस्तानात जाणार सौदीचे राजकुमार, लष्करप्रमुखांना भेटणार

India Pakistan Relations, Saudi Arabia Prince जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणारे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आता प्रथम पाकिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, सौदी राजकुमार 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या छोटाशा दौऱ्यावर येऊ शकतात. या दरम्यान सौदीचे राजकुमार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानातूनच सौदी राजकुमार नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. सौदी राजकुमारांची भारत आणि पाकिस्तानची ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तानी विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारताशी मैत्रीपूर्ण संबंधी प्रस्थापित करण्याबबत पाकिस्तानवर आखाती देशांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे हा दौरा भारत-पाकिस्तान मधील वैर कमी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल ठरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या संकटात आहे आणि सौदी अरेबिया-यूएईच्या कर्जाच्या आधारे डिफॉल्टपासून वाचला आहे. सौदी अरेबिया आणि यूएई या दोघांनीही आता पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की ते फुकटात पैसे देणार नाहीत. यामुळेच पाकिस्तानला युएई आणि सौदी अरेबियाला आपल्या राष्ट्रीय मालमत्तेतील हिस्सा विकावा लागला आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानमधील खाणीत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. एवढेच नाही तर ग्वादारमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना बांधण्यासाठी सौदी अरेबिया सुमारे 3 अब्ज डॉलर्सची मदत देणार आहे.

सौदी आणि यूएईचा पाकिस्तानवर दबाव

यापूर्वी, सौदी अरेबिया आणि यूएईने गरीब पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची मदत दिली, ज्यामुळे IMF कडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनचे पत्रकार कामरान युसूफ यांच्या मते, हे देश आता भारतासोबतचे संबंध सामान्य करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मैत्री सध्या एका नव्या उंचीवर आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी भारताने सौदी अरेबियाला या संघटनेचे सदस्य बनविण्यास खुले समर्थन केले होते.

पाकिस्तानी पत्रकार रऊफ क्लासरा यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये आता नवाझ शरीफ यांचे सरकार स्थापन होत आहे. नवाझ शरीफ यांना लष्कराचा पाठिंबा असून आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. नवाझ शरीफ हे सौदी अरेबिया आणि यूएईच्या अगदी जवळचे मानले जातात. यापूर्वी इम्रान खान यांच्या काळात भारतासोबतचे संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पीटीआय नेत्याच्या पक्षांतरामुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता त्याची जबाबदारी नवाझ शरीफ यांच्यावर टाकली जात आहे. नवाझ शरीफ आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असा समज आहे की, पंतप्रधान मोदींसोबत जर कोणी संबंध सुधारू शकतं तर ते नवाझ शरीफ आहेत. पीएम मोदींनी यापूर्वी पंतप्रधान असताना नवाझ शरीफ यांच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे आता भारत-पाक मैत्रीच्या दृष्टीने या साऱ्या घटना चांगल्या ठरू शकतात, असे बोलले जात आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारतPakistanपाकिस्तान