शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लंडनमध्ये पडसाद असहिष्णुतेचे

By admin | Published: November 14, 2015 3:48 AM

भारतभरातील अभिजनांनी उपस्थित केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिच्छा इंग्लंड वारीतही सोडला नाही.

लंडन : भारतभरातील अभिजनांनी उपस्थित केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिच्छा इंग्लंड वारीतही सोडला नाही. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी यांच्याकडे भारतात वाढीस लागलेल्या असहिष्णू वातावरणाबाबत विचारणा झालीच. अब्जावधींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार, राणीकडचे प्रीतिभोजन, पंतप्रधानांकडचा मुक्काम, भारतीयांसाठीच्या भाषणासाठीची विलक्षण आतुरता, उत्स्फूर्त तिरंगी स्वागत आणि निदर्शनांचे किंचितसे गालबोट अशा अपूर्व माहोलातही ‘असहिष्णुते’ने गाठल्यावर भारतात असहिष्णुतेला थारा नाही आणि भारत ही भगवान बुद्ध आणि गांधीजींची भूमी असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. भारत सध्या असहिष्णू देश का होत चालला आहे असे विचारताच मोदी म्हणाले, ‘‘भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांची भूमी आहे, आणि भारतीय संस्कृती मूलभूत सामाजिक तत्त्वांच्या विरोधातील कोणतीही घटना स्वीकारत नाही. एखाददुसऱ्या घटनेबाबतही भारत असहिष्णुता खपवून घेत नाही. १२५ कोटींच्या देशामध्ये ती घटना महत्त्वपूर्ण असो वा नसो, आमच्यासाठी ती गंभीरच आहे.’’ भारतातील कायदा त्याचे काम चोख बजावत असतो आणि यापुढेही करत राहील. भारत लोकशाहीचे एक जिवंत प्रतीक असून, आमची राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि विचारांचे रक्षण करते आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीत भारत आणि इंग्लंडमधील विविध कंपन्यांच्या सीईओंच्या गोलमेज परिषदेस संबोधित केले. या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत आश्वासक आणि सातत्याने प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक बाबतीत भारत आणि इंग्लंड एकमेकांसाठीच बनले आहेत. या आर्थिक नात्याचे मार्गदर्शक खासगी कंपन्यांंचे सीईओच आहेत. याबरोबरच भारतीय रेल्वेची स्थानके पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. कौशल्यविकास हाच माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असून, सर्व जगाला मनुष्यबळ भारत पुरवू शकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. (वत्तसंस्था)