शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मेजावांना जायचंय चंद्रावर, पृथ्वीच्या खाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 13:25 IST

अंतराळात जाण्याचं भाग्य फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. पूर्वी ते फक्त संशोधक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनाच मिळत होतं.

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा १९८४ मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचा अंतराळातून संवाद झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना विचारले होते, अंतराळातून तुम्हाला आपला भारत देश कसा दिसतो आहे?  पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राकेश शर्मा यांनी दिलेलं उत्तर आजही भारतवासीयांच्या स्मरणात आहे. राकेश शर्मा यांचे त्यावेळचे उद्गार होते, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा !...’

अंतराळात जाण्याचं भाग्य फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. पूर्वी ते फक्त संशोधक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनाच मिळत होतं. आज करोडपती ‘सर्वसामान्य’ लोकही अंतराळात जाऊ लागले आहेत. त्यातलंच एक नाव आहे. युसाकु मेजावा. जपानमधील ते एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. नुकतेच ते बारा दिवसांचा अंतराळ दौरा करून परत पृथ्वीवर आले. अंतराळातून परतल्यावर लगेच त्यांनी सोशल मीडियावर तेथील आपल्या अनुभवांच्या पोस्ट्स, फोटो आणि व्हिडिओही  शेअर केले आहेत. आपल्या रोमांचक अनुभवाची कहाणी सांगताना त्यांनी अंतराळ प्रवासाचे नुसते किस्सेच  सांगितले नाहीत, तर अंतराळात असताना ब्रशने आपले दात कसे घासायचे, चहा कसा करायचा, यासंदर्भातलंही वर्णन केलं.

२०२३ मध्ये मेजावा यांना चंद्रावरही जायचं आहे. जे संशोधक, अंतराळ अभ्यासक नाहीत, अशाही अनेकांना आज अंतराळात जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मदतीनं काही जण अंतराळातही पर्यटन करून आले आहेत. या कंपन्यांमध्ये प्रमुख नावे आहेत, ती म्हणजे एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी, जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ ही कंपनी, याशिवाय ‘व्हर्जिन अटलांटिक’, ‘एक्ससीओआर एरोस्पेस’, ‘आर्माडिलो एरोस्पेस अशा अनेक कंपन्या आता लोकांना अंतराळ पर्यटनाला घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

‘स्पेस ॲडव्हेन्चर्स’ ही कंपनी तर पर्यटकांना अंतराळातही थरारक अनुभव मिळवून देणार आहे. मेजावा यांनी एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीशी कधीचाच करार केला असून,  मस्क यांच्यासोबत २०२३ मध्ये ते चंद्रसफारीही  करणार आहेत.  ही सफारी केल्यानंतर चंद्रावर जाणारे ते पहिले ‘सर्वसामान्य’ व्यक्ती असतील. हा ‘इतिहास’ रचण्यासाठी ते उत्सुक आहेत. 

राकेश शर्मा यांनी अंतराळातून दिसणाऱ्या भारताचं जसं वर्णन केलं होतं, साधारण तसंच वर्णन मेजावा यांनीही पृथ्वीबाबत केलं आहे. मेजावा म्हणतात, जेव्हा तुम्ही अंतराळात जाता, तेव्हा तुम्हाला पृथ्वीची महत्ता कळते. या अंतराळ यात्रेने पृथ्वीबद्दल मला अधिक कृतज्ञ केले आहे. पृथ्वीप्रमाणेच अंतराळातही हवा आहे, वास आहे आणि अनेक ऋतूही आहेत याबद्दल आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. अंतराळातही नंतर मानवी वस्ती वाढेल, याविषयी मी आशावादी आहे.

मेजावा पुढे सांगतात, शून्य गुरुत्वाकर्षणात चहा बनवणं, स्वच्छ कपड्यांची कमतरता यासारखी आव्हानं होती, पण एकूणच तो अनुभव अतिशय शानदार होता. अंतराळात शिरतानाचा अनुभव तर इतका रोमांचक होता, की मला जणू काही वाटलं, ‘शिन्कासेन’ (जपानी बुलेट ट्रेन) स्टेशनवरून सुटली आहे. सगळं काही इतकं सुरळीत आणि शांतपणे झालं की, काही कळलंही नाही. जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, पृथ्वीची जी छायाचित्रे आपण पाहतो, त्यापेक्षा पृथ्वी शंभर पटींनी जास्त सुंदर आहे.

अंतराळातला अनुभव अतिशय छान असला, तरी शून्य गुरुत्वाकर्षणातून बाहेर येणं, सर्वसामान्य आयुष्यात परत येणं या गोष्टी अजून तरी तितक्याशा सोप्या नाहीत. मी पहिल्यांदा त्यातून बाहेर पडू इच्छितो.अंतराळात काही छोट्या मोठ्या आव्हानांचाही सामना करावा लागतो. एकतर अंतराळात झोप घेणं, झोप येणं ही गोष्ट सोपी नाही. झोप येण्यासाठी आपल्या सतत संघर्ष करावा लागतो. आपलं शरीर धरून ठेवण्यासाठी येथे काहीही नाही. माझ्या मनात आणखीही काही गोष्टींमुळे हिंदोळे सुरू आहेत. त्यातील सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे २०२३ मध्ये चंद्रभेटीसाठी मी अतिशय उत्सुक आहे.