शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा; 'म्हणे शांतता आम्हाला हवीय, पण भारताला नकोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 23:28 IST

युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे.

कराची : युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे. इंटरप्ले ऑफ इकॉनॉमी अँड सिक्युरिटी वर येथे बुधवारी झालेल्या चर्चासत्रात बाज्वा बोलत होते. ते म्हणाले की, भारतासोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आमची बाह्य आघाडी नेहमीच अस्थिर राहिली आहे. आमच्या पूर्वेला युद्धखोर भारत आणि पश्चिमेला अस्थिर अफगाणिस्तान आहे. ऐतिहासिक गोष्टींमुळे आणि नकारात्मक स्पर्धेमुळे हा भाग जखडलेला आहे, असे बाज्वा म्हणाले. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन्ही सीमांवर असलेल्या अस्थिर परिस्थितीवरही भाष्य केलं.

तणावग्रस्त परिस्थितीचे रूपांतर धोक्यांमध्ये व्हायच्या आधी ती बदलायला हवी आणि त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. बाज्वा यांनी देशाच्या प्रचंड वाढत्या कर्जाबद्दल काळजी व्यक्त केली. पाकिस्तानला भिकेचे भांडे फेकून द्यायचे असेल तर सकल देशी उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी असलेले कर प्रमाण बदलावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. देशासाठी नंतर धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींचा सामना आताच करायला हवा, असेही पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी म्हटले. देशाच्या बुडीत चाललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत