शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा; 'म्हणे शांतता आम्हाला हवीय, पण भारताला नकोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 23:28 IST

युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे.

कराची : युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे. इंटरप्ले ऑफ इकॉनॉमी अँड सिक्युरिटी वर येथे बुधवारी झालेल्या चर्चासत्रात बाज्वा बोलत होते. ते म्हणाले की, भारतासोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आमची बाह्य आघाडी नेहमीच अस्थिर राहिली आहे. आमच्या पूर्वेला युद्धखोर भारत आणि पश्चिमेला अस्थिर अफगाणिस्तान आहे. ऐतिहासिक गोष्टींमुळे आणि नकारात्मक स्पर्धेमुळे हा भाग जखडलेला आहे, असे बाज्वा म्हणाले. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन्ही सीमांवर असलेल्या अस्थिर परिस्थितीवरही भाष्य केलं.

तणावग्रस्त परिस्थितीचे रूपांतर धोक्यांमध्ये व्हायच्या आधी ती बदलायला हवी आणि त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. बाज्वा यांनी देशाच्या प्रचंड वाढत्या कर्जाबद्दल काळजी व्यक्त केली. पाकिस्तानला भिकेचे भांडे फेकून द्यायचे असेल तर सकल देशी उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी असलेले कर प्रमाण बदलावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. देशासाठी नंतर धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींचा सामना आताच करायला हवा, असेही पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी म्हटले. देशाच्या बुडीत चाललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत