शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:23 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे कमी करून, १९६० चा सिंधू पाणी करार रद्द करून आणि अटारी चेकपोस्ट बंद केला आहे.

मंगळवारी पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान, यावर आता भारताने मोठी कारवाई केली. यामध्ये सिंधू नदी पाणी करार मोडला आहे. दरम्यान, आता यावर पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानही भारताच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारत सरकारने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. 

भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध ५ मोठे निर्णय घेतले आहेत. यात सिंधू पाणी करार मोडला आहे, तसेच अटारी इंटीग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्यात आला आहे.

आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई

दरम्यान, आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या निर्णयांवर टीका केली आहे. बुधवारी एका वाहिनीशी बोलताना दार म्हणाले की, भारताने दहशतवादी घटनांबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. भारत रागाच्या भरात हे निर्णय घेत आहे.'भारताने दहशतवादी घटनांबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असंही ते म्हणाले. 

इशाक दार म्हणाले, ज्यावेळी भारतात संकट येते तेव्हा त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले जाते. भारताच्या घोषणांनंतर, पाकिस्तान एनएससी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दार यांनी दिली आहे. 'भारताचे विधान अयोग्य आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून त्याचे उत्तर दिले जाईल. दहशतवादावर अशा प्रकारे राग व्यक्त करणे योग्य नाही, असंही दार म्हणाले.

हे निर्णय घेतले

सरकारने अटारी इंटीग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी आधीच वैध कागदपत्रांसह या मार्गाने भारतात प्रवेश केला आहे त्यांना १ मे २०२५ पर्यंत त्याच मार्गाने परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा आता अवैध मानले जातील आणि या व्हिसाखाली भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान