शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 06:21 IST

सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात कथित अतिरेकी तळांवर हल्ल्यांचा दावा

इस्लामाबाद : इराणनेपाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननेही गुरुवारी जशास तसे प्रत्युत्तर दिले. इराणच्या सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांच्या कथित तळांवर लष्करी हल्ले केले. त्यात नऊ जण ठार झाल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. 

पाकिस्तानने तेहरानमधून आपल्या दूताला परत बोलावल्यानंतर आणि सर्व नियोजित उच्चस्तरीय निलंबित केल्याच्या एका दिवसानंतर गुरुवारी ही कारवाई केली. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले. 

गुप्त माहितीवर आधारित या मोहिमेत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गुरुवारी सकाळी केला. या मोहिमेला पाकिस्तानने ‘मार्ग बार सरमचार’ असे सांकेतिक नाव दिले होते. पर्शियन भाषेत, ‘मार्ग बार’ म्हणजे ‘मृत्यू’ तर बलुच भाषेत ‘सरमचार’ म्हणजे ‘गनिम’ होय.

...अन् चीनने दिला मध्यस्थीचा प्रस्तावचीनने गुरुवारी पाकिस्तान आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर तणाव कमी करण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशांनी संयम आणि शांतता बाळगून तणाव टाळावा, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी केला.

काळजीवाहू पंतप्रधान दावोसहून माघारीवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहण्यासाठी दावोसमध्ये असलेले काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल-हक-ककर आपला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत. परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी हेही युगांडा दौऱ्यावरून तातडीने माघारी येण्यासाठी रवाना झाले आहेत.

हा दोन्ही देशांतील अंतर्गत विषय : भारतइराणचा पाकिस्तानवरील क्षेपणास्त्र हल्ला हा त्या दोन राष्ट्रांतील अंतर्गत चिंतेचा विषय आहे. भारताने नेहमीच दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे. स्वसंरक्षणासाठी देशाने केलेली कृती आम्हाला समजते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

घातक ड्रोन, शस्त्रांचे हल्लेपाकिस्तानी सैन्याच्या प्रसिद्धी शाखेने एका निवेदनात म्हटले आहे की, घातक ड्रोन, रॉकेट, युद्धसामग्री आणि शस्त्रे वापरून अचूक हल्ले केले गेले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या दोन्ही गटांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत.

दोन्ही शेजारी बंधू देश आहेत आणि त्यांनी संवाद आणि परस्पर सल्लामसलत करून समस्या सोडवल्या पाहिजेत. तथापि, पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड करणार नाही.    - आरिफ अल्वी,     अध्यक्ष, पाकिस्तान

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराण