शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताच्या इफ्तार पार्टीत पाकची कागाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 03:09 IST

पाहुण्यांना धमकाविले; सुरक्षारक्षकांनी गेटवरूनच काही जणांना परत पाठविले

इस्लामाबाद : भारतीय उच्च आयुक्तालयाने इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याचा तसेच त्यांना धमकाविल्याचा प्रकार घडला आहे. वाजवीपेक्षा जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवून काही पाहुण्यांना परतही पाठविण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढणार आहे.

भारतीय उच्चायुक्त अजय बिसेरिया यांनी येथील सेरेना हॉटेलमध्ये आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला पाकिस्तानातील अनेक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सांगितले की, ज्यांच्याकडे निमंत्रणपत्रिका व ओळखपत्र होते त्यांनाच हॉटेलच्या आतमध्ये सोडण्यात येत होते. प्रख्यात पत्रकार मेहरिन जेहरा-मलिक यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, भारताने आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ इच्छिणाºया प्रत्येकाशी दहशतवादविरोधी पथकाचे सुरक्षा जवान गैरवर्तन करत होते. या कार्यक्रमाला जाऊ नका, असे दूरध्वनी अज्ञात व्यक्तीने निमंत्रितांना केल्याचेही उघडकीस आले आहे. पाकिस्तानने भारताला जशास तसे उत्तर देण्याच्या नावाखाली इफ्तार पार्टीत केलेला प्रकार मूर्खपणाचा होता, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानशी सुरु असलेली चर्चा थांबविली आहे. यंदा १४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोटवर हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विमानांनी हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. तेव्हापासून दोन्ही देशात मोठा तणाव आहे.

कार्यक्रम रद्द केल्याची थापपाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते फरहतुल्ला बाबर यांनी सांगितले की, सेरेना हॉटेलभोवती सर्वत्र बॅरिकेड ठेवण्यात आले होते. भारताने दिलेली इफ्तार पार्टी रद्द झाल्याचे सुरक्षा जवानांकडून काही निमंत्रितांना सांगण्यात आले. हॉटेलचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. शेवटी चिकाटीने प्रयत्न करून बाबर यांनी सेरेना हॉटेलमध्ये प्रवेश केला व इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यावेळी भारतीय उच्चायुक्त अजय बिसेरिया यांनी सांगितले, इफ्तार पार्टीला येताना निमंत्रितांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी काही निमंत्रित लाहोर, कराची या शहरांतूनही आले होते.

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान