शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

२६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:30 AM

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी सत्ता गेल्यानंतर प्रथमच दिली आहे. या हल्ल्याच्या संदर्भात पूर्णपणे काखा वर करण्याची पाकिस्तानची अधिकृत भूमिका किती धादांत खोटेपणाची आहे, हेच शरीफ यांच्या कबुलीने स्पष्ट होते.‘डॉन’ या पाकिस्तानमधील अग्रगण्य वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात शरीफ यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद आणि मौलाना मसूद अझर यांच्या अनुक्रमे जमात-उद-दावा व जैश-ई-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे प्रत्यक्ष नामोल्लेख करता शरीफ म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवेतर त्यांना शासनबाह्य कृती करणारे (नॉन स्टेज अ‍ॅक्टर्स) म्हणा. पण अशा मंडळींना सीमा ओलांडून मुंबईला जाऊन १५०हून अधिक लोकांचा बळी घेण्यास मोकळीक दिली जाते हे सर्वस्वी चुकीचे आहे, अस्वीकार्य आहे. शेजारी देशांत जाऊन असा हिंसाचार करणाऱ्यांना पाकिस्तान सरकारचीही छुपी साथ असल्याचे सूचित करत शरीफ यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला अद्याप पूर्ण का झाला नाही, असाही सवाल केला. पाकिस्तानच्या या धोरणाचा जगभरात निषेध होत आहे. पाकिस्तान स्वत:च्याच वागण्याने जगात एकाकी पडला आहे. आज जागतिक राजकारणात अफगाणिस्तानवर लोक विश्वास ठेवतात; पण पाकिस्तानवर नाही, असेही ते म्हणाले.मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे युसूफ रझा गिलानी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर शरीफ सत्तेवर आले; पण भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम राहिले. आताही शरीफ यांच्याच पक्षाकडे पाकिस्तानची सत्ता आहे. परंतु व्यक्तिश: त्यांना कोणत्याही सरकारी पदावर राहण्यास किंवा पक्षाचे अध्यक्ष राहण्यासही अपात्र ठरविले आहे.न्यायसंस्था आणि लष्कर यांच्या सक्रिय हस्तक्षेपास आक्षेप घेत शरीफ म्हणाले, दोन-तीन समांतर सरकारे काम करणार असतील तर देशाचा कारभार चालू शकत नाही. हे थांबायला हवे. देशात फक्त एकच, राज्यघटनेनुसार स्थापन झालेले सरकार असू शकते.