शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:30 IST

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी सत्ता गेल्यानंतर प्रथमच दिली आहे. या हल्ल्याच्या संदर्भात पूर्णपणे काखा वर करण्याची पाकिस्तानची अधिकृत भूमिका किती धादांत खोटेपणाची आहे, हेच शरीफ यांच्या कबुलीने स्पष्ट होते.‘डॉन’ या पाकिस्तानमधील अग्रगण्य वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात शरीफ यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद आणि मौलाना मसूद अझर यांच्या अनुक्रमे जमात-उद-दावा व जैश-ई-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे प्रत्यक्ष नामोल्लेख करता शरीफ म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवेतर त्यांना शासनबाह्य कृती करणारे (नॉन स्टेज अ‍ॅक्टर्स) म्हणा. पण अशा मंडळींना सीमा ओलांडून मुंबईला जाऊन १५०हून अधिक लोकांचा बळी घेण्यास मोकळीक दिली जाते हे सर्वस्वी चुकीचे आहे, अस्वीकार्य आहे. शेजारी देशांत जाऊन असा हिंसाचार करणाऱ्यांना पाकिस्तान सरकारचीही छुपी साथ असल्याचे सूचित करत शरीफ यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला अद्याप पूर्ण का झाला नाही, असाही सवाल केला. पाकिस्तानच्या या धोरणाचा जगभरात निषेध होत आहे. पाकिस्तान स्वत:च्याच वागण्याने जगात एकाकी पडला आहे. आज जागतिक राजकारणात अफगाणिस्तानवर लोक विश्वास ठेवतात; पण पाकिस्तानवर नाही, असेही ते म्हणाले.मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे युसूफ रझा गिलानी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर शरीफ सत्तेवर आले; पण भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम राहिले. आताही शरीफ यांच्याच पक्षाकडे पाकिस्तानची सत्ता आहे. परंतु व्यक्तिश: त्यांना कोणत्याही सरकारी पदावर राहण्यास किंवा पक्षाचे अध्यक्ष राहण्यासही अपात्र ठरविले आहे.न्यायसंस्था आणि लष्कर यांच्या सक्रिय हस्तक्षेपास आक्षेप घेत शरीफ म्हणाले, दोन-तीन समांतर सरकारे काम करणार असतील तर देशाचा कारभार चालू शकत नाही. हे थांबायला हवे. देशात फक्त एकच, राज्यघटनेनुसार स्थापन झालेले सरकार असू शकते.