शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

२६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:30 IST

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी सत्ता गेल्यानंतर प्रथमच दिली आहे. या हल्ल्याच्या संदर्भात पूर्णपणे काखा वर करण्याची पाकिस्तानची अधिकृत भूमिका किती धादांत खोटेपणाची आहे, हेच शरीफ यांच्या कबुलीने स्पष्ट होते.‘डॉन’ या पाकिस्तानमधील अग्रगण्य वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात शरीफ यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद आणि मौलाना मसूद अझर यांच्या अनुक्रमे जमात-उद-दावा व जैश-ई-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे प्रत्यक्ष नामोल्लेख करता शरीफ म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवेतर त्यांना शासनबाह्य कृती करणारे (नॉन स्टेज अ‍ॅक्टर्स) म्हणा. पण अशा मंडळींना सीमा ओलांडून मुंबईला जाऊन १५०हून अधिक लोकांचा बळी घेण्यास मोकळीक दिली जाते हे सर्वस्वी चुकीचे आहे, अस्वीकार्य आहे. शेजारी देशांत जाऊन असा हिंसाचार करणाऱ्यांना पाकिस्तान सरकारचीही छुपी साथ असल्याचे सूचित करत शरीफ यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला अद्याप पूर्ण का झाला नाही, असाही सवाल केला. पाकिस्तानच्या या धोरणाचा जगभरात निषेध होत आहे. पाकिस्तान स्वत:च्याच वागण्याने जगात एकाकी पडला आहे. आज जागतिक राजकारणात अफगाणिस्तानवर लोक विश्वास ठेवतात; पण पाकिस्तानवर नाही, असेही ते म्हणाले.मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे युसूफ रझा गिलानी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर शरीफ सत्तेवर आले; पण भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम राहिले. आताही शरीफ यांच्याच पक्षाकडे पाकिस्तानची सत्ता आहे. परंतु व्यक्तिश: त्यांना कोणत्याही सरकारी पदावर राहण्यास किंवा पक्षाचे अध्यक्ष राहण्यासही अपात्र ठरविले आहे.न्यायसंस्था आणि लष्कर यांच्या सक्रिय हस्तक्षेपास आक्षेप घेत शरीफ म्हणाले, दोन-तीन समांतर सरकारे काम करणार असतील तर देशाचा कारभार चालू शकत नाही. हे थांबायला हवे. देशात फक्त एकच, राज्यघटनेनुसार स्थापन झालेले सरकार असू शकते.