शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:28 IST

५ जूनला पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे शिमला करार संपुष्टात आल्याचा दावा केला होता. 

इस्लामाबाद - पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी १९७२ च्या ऐतिहासिक शिमला कराराला डेड डॉक्युमेंट असा उल्लेख केला. ख्वाजा यांच्या या दाव्याने भारताला आयती संधीच मिळाली. पाकिस्ताननं आधी चूक केली आणि दुसऱ्याच दिवशी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाला स्वत:च्या मंत्र्‍यांच्या विधानाला खुलासा करण्याची वेळ आली. भारतासोबत कुठलाही द्विपक्षीय करार रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे पाकिस्तान सरकारमधील अंतर्गत कुरघोडी समोर आली.

एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, अलीकडच्या घटना पाहता इस्लामाबादमध्ये अंतर्गत चर्चा निश्चितच होत आहेत परंतु आतापर्यंत भारतासोबत कुठलाही द्विपक्षीय करार रद्द करण्याबाबत औपचारिक कार्यवाही नाही. शिमला करार अद्यापही कायम आहे असं स्पष्ट केले. एक दिवस आधीच ५ जूनला पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे शिमला करार संपुष्टात आल्याचा दावा केला होता. 

शिमला करारात तिसरा कुणी नाही - ख्वाजा

जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले होते की, शिमला करार हा द्विपक्षीय होता कारण त्यात तिसरा कुणीही अथवा विश्व बँक नव्हती. इस्लामाबाद शिमला करार रद्द करण्याचा विचार करू शकते अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियंत्रण रेषा युद्ध विराम रेषा बनेल. शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.

शिमला कराराचा इतिहास काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७२ च्या युद्धानंतर शिमला करार बनवण्यात आला होता. या कराराचा हेतू दोन्ही देशातील तणाव आणि संघर्ष शांततेने आपापसात सोडवले जातील. त्यात इतर कुणीही मध्यस्थी करणार नाही. हा करार भारताच्या कुटनितीचा भाग होता.  १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने पीओकेतील चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके