शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:28 IST

५ जूनला पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे शिमला करार संपुष्टात आल्याचा दावा केला होता. 

इस्लामाबाद - पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी १९७२ च्या ऐतिहासिक शिमला कराराला डेड डॉक्युमेंट असा उल्लेख केला. ख्वाजा यांच्या या दाव्याने भारताला आयती संधीच मिळाली. पाकिस्ताननं आधी चूक केली आणि दुसऱ्याच दिवशी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाला स्वत:च्या मंत्र्‍यांच्या विधानाला खुलासा करण्याची वेळ आली. भारतासोबत कुठलाही द्विपक्षीय करार रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे पाकिस्तान सरकारमधील अंतर्गत कुरघोडी समोर आली.

एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, अलीकडच्या घटना पाहता इस्लामाबादमध्ये अंतर्गत चर्चा निश्चितच होत आहेत परंतु आतापर्यंत भारतासोबत कुठलाही द्विपक्षीय करार रद्द करण्याबाबत औपचारिक कार्यवाही नाही. शिमला करार अद्यापही कायम आहे असं स्पष्ट केले. एक दिवस आधीच ५ जूनला पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे शिमला करार संपुष्टात आल्याचा दावा केला होता. 

शिमला करारात तिसरा कुणी नाही - ख्वाजा

जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले होते की, शिमला करार हा द्विपक्षीय होता कारण त्यात तिसरा कुणीही अथवा विश्व बँक नव्हती. इस्लामाबाद शिमला करार रद्द करण्याचा विचार करू शकते अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियंत्रण रेषा युद्ध विराम रेषा बनेल. शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.

शिमला कराराचा इतिहास काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७२ च्या युद्धानंतर शिमला करार बनवण्यात आला होता. या कराराचा हेतू दोन्ही देशातील तणाव आणि संघर्ष शांततेने आपापसात सोडवले जातील. त्यात इतर कुणीही मध्यस्थी करणार नाही. हा करार भारताच्या कुटनितीचा भाग होता.  १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने पीओकेतील चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके