शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:15 IST

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

इस्लामाबाद : आता युद्ध झाल्यास  भारताला जोरदार उत्तर दिले जाईल व भारत त्यांच्याच लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबून जाईल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कोणत्याही चुकीच्या कृतीबाबत इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. एक्सवर त्यांनी म्हटले आहे की, भारतीय नेतृत्व आपला गमावलेला विश्वास मिळवण्यासाठीच बेजबाबदार आणि चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे. भारत हेतूपुरस्सरपणे तणाव वाढवून नागरिकांचे लक्ष देशांतर्गत प्रश्नांवरून भटकवत आहे.

दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर : पाकिस्तान

पाकिस्तानचे म्हणणे आहे की, यावर्षी दोन्ही देश भारतामुळे अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. भारताने आमचे सडेतोड उत्तर विसरू नये.भारताकडून खोटी विधाने केली जात आहेत. सारासार विचार न करता युद्धाला चिथावणी दिली जात आहे.अनेक दशके पाकची चूक असल्याचे दाखवले. परंतु वास्तव हे आहे की, भारतच हिंसाचार व दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे.

काय म्हणाले होते भारताचे संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह : भारताच्या सन्मानाची बाब असल्यास आम्ही कधीही समझोता करणार नाहीत. देशाची एकता व अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी गरज पडल्यास कोणतीही सीमा पार करू शकतो.लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी : भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये संयम दाखवला. परंतु आता काही झाल्यास भारत संयम दाखवणार नाही. आता त्यापुढील कारवाई करू.हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकची १२ ते १३ विमाने जमीनदोस्त केली. भारतीय सैन्याने पाकचे पाच फायटर जेट व एक सी-१३० (ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट) नष्ट केले. ही विमाने पाकचे एअरबेस व हँगरमध्ये (विमानांची पार्किंग) उभी होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's hollow threats continue: Claims India will be crushed.

Web Summary : Pakistan threatens India, claiming it will retaliate strongly in any war, crushing India under its own warplane debris. This follows warnings from Indian leaders regarding Pakistani actions, with Pakistan accusing India of escalating tensions and promoting terrorism.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान