शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने दिली दहशतवाद संपवण्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 13:37 IST

अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढलेला असून दहशतवाद्यांविरोधातपाकिस्तानने ठोस कारवाई करावी अशी मागणी भारताने केली. पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. अमेरिकेनेही पाकिस्ताला तंबी देत दहशतवाद संपवा अन्यथा याचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली. 

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी महमूद कुरेशी यांनी बोल्टन यांना दहशतवाद संपवण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती जॉन बोल्टन यांनी ट्विटर वरुन दिली.  जॉन बोल्टन यांनी ट्विटरमधून सांगितले की,  जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटना यांच्या विरोधात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी यासाठी परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कुरेशी यांनी पाकिस्तान दहशतवाद संपविण्यासाठी कठोर कारवाई करत आहे त्याचसोबत गेल्या काही दिवसांपासून भारताशी वाढलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलत आहे. 

 

सध्या भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे अमेरिकेच्या तीन दिवस दौ-यावर आहे. त्यामुळे जॉन बोल्टन यांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे.  विजय गोखले यांनी दौ-याच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव कायम राहणार आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो आणि भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या झालेल्या बैठकीत दहशतवाद या विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्ताने कठोर पावले न उचलावी याबाबत अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणावा अशी मागणी भारताने केली. यावेळी पोम्पियो यांनी अमेरिका दहशतवाद्याच्या मुद्द्यावर नेहमी भारताच्या पाठीशी राहू असं विश्वास दिला. 

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव वाढला होता. पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून बालकोट येथे दहशतवादी तळांना टार्गेट केले होते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान