शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पाकचा मंत्री म्हणे, अणुबॉम्ब टाकू, पाणी थांबविल्यास युद्ध; अण्वस्त्रे सजावटीसाठी ठेवली नाहीत : अब्बासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:53 IST

पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली नाही. आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. आम्ही शाहीन, गोरी आणि गझनवीसारखी १३० क्षेपणास्त्रे भारतासाठी ठेवली आहेत. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर आम्ही त्यांचा श्वास थांबवू. भारताने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली नाही. आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे.

कंपन्या दिवाळखोरीत निघतील

अब्बासी म्हणाले, आमची क्षेपणास्त्रे भारताकडे टार्गेट करून ठेवली आहेत. भारताला आपल्याकडे शस्त्रे आहेत हे माहिती असल्याने ते आपल्यावर हल्ला करू शकत नाहीत.  पाकने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले.  जर १० दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवले तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील.

रशिया, चीनने मध्यस्थी करावी : पाकिस्तान

या हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तान रशिया आणि चीनला सहभागी करून घेऊ इच्छित आहे. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘मला वाटते की रशिया, चीन किंवा अगदी पाश्चात्य देशही यात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात आणि ते एक तपास पथकदेखील स्थापन करू शकतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान