शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक समाधानी

By admin | Updated: March 18, 2016 01:47 IST

दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार, गरिबी आणि निरक्षरता अशा अनेक समस्यांनी वेढलेले असूनही पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आहेत.

न्यूयॉर्क : दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार, गरिबी आणि निरक्षरता अशा अनेक समस्यांनी वेढलेले असूनही पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’च्या २०१५च्या अहवालामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.दरडोई उत्पन्न, अपेक्षित आयुर्मर्यादा, सामाजिक आधार आणि जीवनाविषयीचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य या घटकांना समाधानाचे निदर्शक मानून आनंदी देशांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे. २०१५ च्या जागतिक अहवालातील आनंदी १५८ देशांच्या यादीत भारताचा ११७ वा क्रमांक लागतो. २०१३च्या तुलनेत भारताचे या यादीतील स्थान सहा अंकांनी घसरले आहे. तीन वर्षांपूर्वी भारत १११ व्या स्थानी होता. या यादीत पाकिस्तान ८१ व्या तर बांगलादेश १०९ व्या स्थानी आहे. याचाच अर्थ या दोन्ही देशांतील नागरिक भारतांतील नागरिकांहून अधिक समाधानी आहेत. रशियासमर्थक बंडखोरांसोबतच्या संघर्षात भरडला जात असलेला युक्रेन (१११ वे स्थान), इस्रायलसोबतच्या युद्धात होरपळून गेलेला पॅलेस्टाईन (१०८ वे स्थान) व इसिसकडे मोठा भूभाग गमवावा लागलेला इराक (११२ वा क्रमांक) या देशातील नागरिकही भारतीयांहून अधिक समाधानी आहेत. स्वीत्झर्लंड जगातील सर्वात आनंदी देश ठरला. पहिल्या पाच देशांत स्वीत्झर्लंडशिवाय आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे आणि कॅनडाचा समावेश आहे. आनंद, समाधान हे सामाजिक प्रगती व सार्वजनिक धोरणाचे उद्दिष्ट मोजण्याचे एकक मानले जाते, असे या अहवालात म्हटले आहे. आनंदी, समाधानी देशांच्या यादीत अमेरिका १५ व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)तळाचे दहा देशआनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान, सीरिया, टोगो, बुरुंडी, बेनिन, रवांडा, बुर्किना फासो, आयव्हरी कोस्ट, गुनिया आणि चाड या देशांचा तळाच्या दहा देशांत समावेश आहे.