शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:17 IST

Pakistan water Crisis: पाकिस्तान सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे.

Pakistan water Crisis: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंदू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला, त्यामुळे पाकमध्ये आतापर्यंतची सर्वात भीषण पाणी टंचाई आली आहे. जलतज्ज्ञांच्या मते, भारतातून वाहणाऱ्या चिनाब नदीचा प्रवाह ९२% ने कमी झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध सारख्या मोठ्या कृषी क्षेत्रातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

चिनाब नदीतील पाणी 'डेड लेव्हल' च्या खाली मीडिया रिपोर्ट्सनुसार, २९ मे रोजी चिनाब नदीचा प्रवाह ९८,२०० क्युसेक होता, जो आता ७,२०० क्युसेक पर्यंत कमी झाला आहे. पाण्याची पातळी इतकी घसरली आहे की, ती 'डेड लेव्हल' च्या खाली गेली आहे. यामुळे ४०% पेक्षा जास्त खरीप पिके सुकली असून, उर्वरित पिकेदेखील धोक्यात आली आहेत.

६.५ कोटी लोक प्रभावितपंजाब आणि सिंधमधील सुमारे ६.५ कोटी लोक सिंचनासाठी चिनाबवर अवलंबून आहेत. पाण्याची कमतरता आणि पिकांच्या नुकसानीमुळे त्रस्त शेतकरी संघटनांनी आता इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकार कोणतीही मदत देत नाही आणि भारताविरुद्ध कोणतेही स्पष्ट राजनैतिक पाऊल उचलले गेले नाही.

४,५०० अब्ज रुपयांचे नुकसानकृषी संघटना 'पीआरए' आणि सिंचन विभागाच्या आकडेवारीनुसार, पावसाअभावी आणि पाणीपुरवठ्यात घट झाल्यामुळे पाकिस्तानला आतापर्यंत ४,५०० अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. भूजल पातळीही घसरली आहे आणि हजारो ट्यूबवेल कोरड्या पडल्या आहेत. मंगला धरणासारख्या प्रमुख जलस्रोतांची पाणी पातळीही धोक्याच्या रेषेखाली गेली आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, ही परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तानला गंभीर राष्ट्रीय अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो.

पाण्यासाठी भारताकडे विनवणीसिंधू पाणी करार आणि पाणीपुरवठा पुनर्संचयित करण्याबाबत पाकिस्तानने आतापर्यंत भारताला चार औपचारिक पत्रे पाठवली आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, यापैकी एक पत्र ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आले होते. ही सर्व पत्रे पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पाठवली होती, जी नंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे (एमईए) पाठवण्यात आली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान