शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

भारतासमोर पाकिस्तान झुकला, चर्चेसाठी गुपचूप प्रस्ताव पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 20:29 IST

पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे.

इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अर्थव्यवस्थेचा कोसळता डोलारा सावरण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने चर्चेसाठी गुपचूप संपर्क साधला आहे. मात्र भारताकडून पाकिस्तानला फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालेला नाही. एक पाश्चिमात्य मुत्सद्दी आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडून अत्यंत गुपचूप पद्धतीने हा संपर्क साधण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा 2015 पासून बंद असून, ती नव्याने सुरू करण्यासाठी हा संपर्क साधण्यात आला होता. दोन्ही देशांमधील व्यापारामधील अडथळे दूर करण्यासाठी पाकिस्तान  भारतासोबत चर्चेसाठी प्रयत्नशील आहे.  दोन्ही देशांमधील व्यापार मुक्तपणे सुरू झाल्यास पाकिस्तानला भारतातील स्थानिक बाजारांमध्ये आपला माल पाटवणे शक्य होणार आहे. तसेच काश्मीरबाबत शांततेसाठी होणारी चर्चा द्विपक्षीय व्यापारालाही उत्तेजन देईल कारण परस्पर विश्वास निर्माण होण्यसाठी काश्मीर प्रश्नावरील चर्चा महत्त्वाची मानण्यात येते. देशाची ढासळती अर्थव्यवस्था लष्करी शक्तीसाठी धोका ठरू शकते, त्यामुळे विद्रोही शक्तींना डोके वर काढण्यासाठी बळ मिळू शकते, जे मोठे आव्हान ठरू शकते, ही बाब पाकिस्तानी लष्कराला जाणवली आहे. त्यामुळेच त्यांनी चार पावले मागे येत भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी 9 अब्ज डॉलरची मदत मागणार आहे. पाकिस्तानवर चिनचे अनेक अब्ज डॉलरचे कर्ज असून, या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाक प्रयत्नशील आहे.दरम्यान, भारतासोबतच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, "त्यांचा देश आपल्या सर्व शेजारी देशांची चांगले संबंध निर्माण करू इच्छितो. पाकिस्तानला कमकुवत करून भारताचीही भरभराट होणार नाही, असे जनरल बाजवा यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा संबंध संरक्षणाशी जोडला होता." 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPoliticsराजकारण