शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानने परत पाठवले, भारतासोबतचे व्यापारी संबंधही तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:18 IST

१५ ऑगस्टला पाक काळा दिवस पाळणार; ३७० कलम रद्दबातल केल्याने जळफळाट

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्दबातल केल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले आहे. शिवाय त्यांचे भारतातील उच्चायुक्त मोईन उल हक्क यांना माघारी बोलावून घेतले आहे.यासोबतच भारताबरोबरचे व्यापारी संबंधही तोडण्याचा तसेच राजनैतिक संबंध निम्नस्तरावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रात धाव घेण्याचे पाकिस्तानने ठरवले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णयही पाकने जाहीर केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. कातावलेल्या पाकिस्तानने आपल्या पार्लमेंटचे तातडीचे संयुक्त अधिवेशन मंगळवारी बोलावले आणि ३७० कलमाचा निर्णय घेतल्याने पुलवामासारखे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याची दर्पोक्ती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. भारताने ३७0 कलम रद्द केल्याने आणि लडाख हे वेगळे केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्या चीनने कैलास मानसरोवरला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना व्हिसा नाकारला आहे. (वृत्तसंस्था)काश्मीरमधील स्थितीचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. काश्मिरी जनतेला समर्थन देण्यासाठी यंदा १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370