शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पाकिस्तान सरकारचा दावा, 182 मदरशांवर नियंत्रण, 121 जण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 17:16 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते. 

ठळक मुद्देसरकारने 182 मदरशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे.बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानावर भारतासह जगभरातील अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दवाब टाकला होता.

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते. 

पाकिस्तान सरकारकडून गुरुवारी सांगण्यात आले की, दहशतवाद्यांविरोधात कारवाईत करण्यात येत आहे. यासाठी सरकारने 182 मदरशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे. तसेच, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांविरोधात आधीपासून कारवाई करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली येत ही कारवाई करण्यात येत नाही, असे पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले आहे.  

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात सक्रिय असणारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानावर भारतासह जगभरातील अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दवाब टाकला होता. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन अशा अनेक देशांचा समावेश होता.   

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला