शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पाकिस्तान सरकारचा दावा, 182 मदरशांवर नियंत्रण, 121 जण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 17:16 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते. 

ठळक मुद्देसरकारने 182 मदरशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे.बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानावर भारतासह जगभरातील अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दवाब टाकला होता.

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते. 

पाकिस्तान सरकारकडून गुरुवारी सांगण्यात आले की, दहशतवाद्यांविरोधात कारवाईत करण्यात येत आहे. यासाठी सरकारने 182 मदरशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे. तसेच, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांविरोधात आधीपासून कारवाई करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली येत ही कारवाई करण्यात येत नाही, असे पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले आहे.  

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात सक्रिय असणारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानावर भारतासह जगभरातील अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दवाब टाकला होता. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन अशा अनेक देशांचा समावेश होता.   

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला