शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

तो आमचा नव्हेच! तहव्वूर राणा भारतात येण्याआधीच पाकिस्तानची'झटका'झटक, म्हणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:57 IST

तहव्वूर राणा याला आज भारतात आणण्यात येणार आहे. त्याला भारतात आणण्याआधीच पाकिस्तानने हात वर केले आहेत.

 २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारतामध्ये दाखल झाला आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए आणि आणि गुप्तचर संस्था रॉचं संयुक्त पथक तहव्वूर राणाला घेऊन विशेष विमानाने भारतात आले. दरम्यान, आता पाकिस्तानने हात झटकण्यास सुरूवात केली आहे.

पाकिस्तानने राणासोबत काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन  प्रसिद्ध केले आहे. यामध्ये  म्हटले आहे की, "तहव्वूर राणा याने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो आता कॅनेडियन नागरिक आहे."

२००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यातील कट रचल्याचा राणा हा मुख्य आरोपी मानला जातो. अमेरिकेतून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात आणले आहे. तहव्वूर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 

१६६ जणांनी जीव गमावला होता

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि शेकडो जण जखमी झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे म्हटले जात होते आणि राणावर हल्ल्याच्या नियोजनात मदत केल्याचा आरोप आहे.

राणाच्या चौकशीद्वारे, भारत आता त्या कटात कोण कोण सहभागी होते याचा तपास करु शकते. यामध्ये पाकिस्तानची भूमिका संशयास्पद आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा