शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
2
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
3
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
4
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
5
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे गोत्यात आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
6
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
7
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
8
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
9
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
10
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
11
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
12
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
13
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
14
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
15
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
16
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
17
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
19
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
20
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड

तो आमचा नव्हेच! तहव्वूर राणा भारतात येण्याआधीच पाकिस्तानची'झटका'झटक, म्हणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:57 IST

तहव्वूर राणा याला आज भारतात आणण्यात येणार आहे. त्याला भारतात आणण्याआधीच पाकिस्तानने हात वर केले आहेत.

 २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारतामध्ये दाखल झाला आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए आणि आणि गुप्तचर संस्था रॉचं संयुक्त पथक तहव्वूर राणाला घेऊन विशेष विमानाने भारतात आले. दरम्यान, आता पाकिस्तानने हात झटकण्यास सुरूवात केली आहे.

पाकिस्तानने राणासोबत काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन  प्रसिद्ध केले आहे. यामध्ये  म्हटले आहे की, "तहव्वूर राणा याने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो आता कॅनेडियन नागरिक आहे."

२००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यातील कट रचल्याचा राणा हा मुख्य आरोपी मानला जातो. अमेरिकेतून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात आणले आहे. तहव्वूर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 

१६६ जणांनी जीव गमावला होता

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि शेकडो जण जखमी झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे म्हटले जात होते आणि राणावर हल्ल्याच्या नियोजनात मदत केल्याचा आरोप आहे.

राणाच्या चौकशीद्वारे, भारत आता त्या कटात कोण कोण सहभागी होते याचा तपास करु शकते. यामध्ये पाकिस्तानची भूमिका संशयास्पद आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा