शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:55 IST

इम्रान खान यांच्या भाषणानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याच्या 5 दिवसांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेशी संवाद साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय भारताकडून पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी भाषणात केला. हल्ल्याचे पुरावे द्या, चौकशीला सहकार्य करतो, असंदेखील इम्रान म्हणाले. भारतानं आक्रमण केल्यास पाकिस्तानदेखील चोख प्रत्युत्तर देईल, अशा इशारादेखील खान यांनी दिला. यानंतर आता खान यांचे मंत्रीदेखील भारताविरोधात आगलावी भाषणं करु लागले आहेत. भारतानं शांततेची बोलणी केली, तर आम्हीदेखील शांततेविषयी बोलू. मात्र त्यांनी युद्धाची भाषा केली, तर आम्हीदेखील त्याच भाषेत उत्तर देऊ, असं पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद म्हणाले. इम्रान खान यांनी 20 कोटी पाकिस्तानी जनतेच्या वतीनं भाषण केलं. पाकिस्ताननं हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यासाठी पाकिस्तान म्हणजे जीवन आहे आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली. युद्धाची भाषा केल्यास आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल आणि ना मंदिरात कधी घंटानाद होईल, अशा शब्दांमध्ये अहमद यांनी भारताला धमकी दिली. पाकिस्तान मुस्लिमांचा किल्ला आहे आणि आज साऱ्या जगातील मुस्लिमांचं लक्ष पाकिस्तानकडे आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. पाकिस्तानची 20 कोटी जनता इम्रान खान यांच्यासोबत आहे. युद्ध असो वा शांतता, देशातील जनता खान यांच्यासोबत आहे, असं ते म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndiaभारत