शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:27 IST

भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काबूल - अफगाणिस्तानमध्ये येत्या 28 सप्टेंबरला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यादरम्यान अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार अमरुल्लाह सलेह यांनी दहशतवादी संघटना इसिसचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान आयएसआयएस दहशतवाद्यांना फंडिंग करतं याचे सख्त पुरावे अफगाणिस्तानकडे आहेत असं त्यांनी सांगितले आहे. 

अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि माजी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख राहिलेले अमरुल्लाह सलेह यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले की, काबुलमध्ये अलीकडेच एका आयएसआयएसआयच्या दहशतवाद्याला पकडले. त्याच्या चौकशीदरम्यान या गोष्टीसमोर आल्या आहेत. पाकिस्तान आयएसआयएस फंडिंग करते असं चौकशीतून समोर आलं आहे. दहशत पसरविण्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून हत्यारं पुरविण्यात येतात. याचे पुरावे आमच्याकडे आहेत असं अमरुल्लाह यांनी सांगितले. 

तसेच अमरुल्लाह सलेह यांनी भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. अफगाणिस्तान याचे भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे कलम 370 हटविण्याचा निर्णय भारताचा अंतर्गत मामला आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानला आक्षेप घेण्याची गरज नव्हती. तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा प्रश्न घेऊन जाण्याला अर्थ नाही असा टोला सलेह यांनी पाकिस्तानला लगावला आहे. 

पाकिस्तान काश्मीर मुद्दा अफगाणिस्तानशी जोडत आहे त्याचा आम्ही विरोध करतो. सैरभैर झालेला पाकिस्तान अफगाणिस्तानशी बदला घेण्याची भाषा करतो यालाच दहशतवाद म्हणतात. दहशतवादाचा रस्ता सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी तालिबानला ऑफर दिली मात्र त्यांनी इन्कार केला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, दहशतवादी निवडणूक लढवू शकत नाही अन् कोणतीही जागा जिंकू शकत नाहीत. त्यामुळे तालिबानला सक्रीय राजकारणात आणणे कठिण असल्याचं अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले. त्याचबरोबर अफगाणिस्तान भारताला खरा मित्र मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अफगाणिस्तानशी आणखी चांगले संबंध व्हावेत अशीच इच्छा आहे. भारतासोबतची मैत्री आणखी मजबूत व्हावी असंही अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानISISइसिसterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर