शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:25 IST

बाबर यांचं पुस्तक द जरदारी प्रेसिडेंसी नाऊ इट मस्ट बी टोल्ड या पुस्तकाच्या हवाल्याने एक रिपोर्ट समोर आला आहे

नवी दिल्ली - २००८ मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांचे माजी सल्लागार आणि विद्यमान प्रवक्ते फरहतुल्ला बाबरने मोठा दावा केला आहे. जरदारी यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अण्वस्त्रांचा पहिला वापर न करण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याची गुप्तचर यंत्रणा ISI संतापली होती आणि त्यानंतर काहीच दिवसांतच मुंबईवर हल्ला घडवण्यात आला असा दावा त्यांनी नव्या पुस्तकात केला आहे.

बाबर यांचं पुस्तक द जरदारी प्रेसिडेंसी नाऊ इट मस्ट बी टोल्ड या पुस्तकाच्या हवाल्याने एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यात कसं दिल्लीतील एका मिडिया संमेलनात भारतीय पत्रकार करण थापर यांना दिलेल्या सॅटेलाईट मुलाखतीत जरदारी यांनी भारताला अण्वस्त्रे पहिले न वापरण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे पाकिस्तानात काही गट संतापला होता. पाकिस्तान अण्वस्त्राचा पहिला वापर करणार नाही असं जरदारी यांनी म्हटल्याने पाकिस्तानी सैन्यात खळबळ माजली होती. या मुलाखतीच्या ४ दिवसानंतर २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला झाला, ज्यात १६६ लोक मारले गेले असंही पुस्तकात म्हटलं आहे.

शांततेच्या प्रयत्नांना चाप बसला

हा हल्ला पाकिस्तानी सैन्यातील आयएसआयची थेट प्रतिक्रिया होती. जेणेकरून भारतासोबत कुठल्याही संभाव्य शांतता प्रयत्नाला आळा बसेल. या हल्ल्यामुळे पुढील काही वर्ष दोन्ही देश युद्धाच्या जवळ आले होते आणि शांततेसाठी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते असंही बाबर यांनी म्हटलं आहे. परंतु रिपोर्टमध्ये केलेला दावा आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या तथ्यांमध्ये ताळमेळ दिसत नाही. 

दाव्यानुसार, जरदारी यांनी शांततेच्या प्रस्तावाची ऑफर २२ नोव्हेंबरला दिली होती परंतु आयएसआयकडून ट्रेनिंग घेऊन हत्यारांसह लष्कर ए तोय्यबाचे १० दहशतवादी २१ नोव्हेंबरलाच कराचीहून समुद्री मार्गे मुंबईत दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रवाना झाल्याचे बोलले जाते.  

English
हिंदी सारांश
Web Title : ISI orchestrated Mumbai attacks due to peace talks: Claims spokesman.

Web Summary : Ex-Pakistani President Zardari offered India no-first-use of nuclear weapons. ISI, angered by this, orchestrated the 2008 Mumbai attacks to derail peace efforts, claims Zardari's ex-advisor. The attack jeopardized India-Pakistan relations.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला