शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:56 IST

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे.

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरच्या (POK) उत्तरेकडील भागात गिलगिट बाल्टिस्तानमध्ये लोक मागील काही दिवसांपासून पाकिस्तानविरोधात निदर्शने करत आहेत. हा भाग भारतानं केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये घ्यावा अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. महागाई, बरोजगारीनं त्रस्त जनतेने पाकिस्तान सरकारविरोधात भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी भारतात सामावून घ्यावं अशी मागणी करत लोक रस्त्यावर उतरली आहेत. 

गेल्या अनेक दशकापासून पाकिस्तान सरकारकडून आम्हाला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याचसोबत आमच्या भागावर अन्याय सुरू आहेत. सोशल मीडियावर या निदर्शनाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत ज्यात गिलगिट बाल्टिस्तानचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील सकरदू कारगिल रोड पुन्हा सुरू करावा. लडाखमध्ये जे बाल्टिस्तानचे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्हाला राहू द्यावं अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. 

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. या भागात लोकांनी स्वातंत्र्यापासून हिरावलं जात आहे. महागाईमुळे गहू आणि सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकत नाही. त्यासाठी सरकारने सब्सिडी द्यावी अशी मागणी आंदोलन करणाऱ्या लोकांनी केली आहे.  

पाकिस्तानी लष्कर गिलगिट-बाल्टिस्तानमधील गरीब भागातील जमीन आणि संसाधनांवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा दावा करत आहे. जीबीमध्ये पाकिस्तान सरकार आणि लोकांमधील जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून आहे, परंतु २०१५ पासून हा वाद आणखी वाढला आहे. हा भाग पीओकेमध्ये असल्याने जमीन त्यांच्या मालकीची आहे असा स्थानिकांचा असा युक्तिवाद आहे. त्याच वेळी, प्रशासनाचे म्हणणे आहे की जी जमीन कोणालाही दिली गेली नाही, ती पाकिस्तान सरकारची आहे.

पाकिस्तानचे आर्थिक संकट आणि लोकांचा निषेधपाकची संपूर्ण जनता सध्या दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहे. देशात गहू, डाळी, साखर आदींचा मोठा तुटवडा असून, त्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानातील सरकार या भागातील लोकांशी भेदभावपूर्ण वागणूक देत आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआयची या भागात सत्ता आहे, त्यामुळे शाहबाज शरीफ यांचे सरकार जाणीवपूर्वक वस्तूंचा पुरवठा करू देत नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओके