शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:56 IST

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे.

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरच्या (POK) उत्तरेकडील भागात गिलगिट बाल्टिस्तानमध्ये लोक मागील काही दिवसांपासून पाकिस्तानविरोधात निदर्शने करत आहेत. हा भाग भारतानं केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये घ्यावा अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. महागाई, बरोजगारीनं त्रस्त जनतेने पाकिस्तान सरकारविरोधात भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी भारतात सामावून घ्यावं अशी मागणी करत लोक रस्त्यावर उतरली आहेत. 

गेल्या अनेक दशकापासून पाकिस्तान सरकारकडून आम्हाला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याचसोबत आमच्या भागावर अन्याय सुरू आहेत. सोशल मीडियावर या निदर्शनाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत ज्यात गिलगिट बाल्टिस्तानचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील सकरदू कारगिल रोड पुन्हा सुरू करावा. लडाखमध्ये जे बाल्टिस्तानचे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्हाला राहू द्यावं अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. 

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. या भागात लोकांनी स्वातंत्र्यापासून हिरावलं जात आहे. महागाईमुळे गहू आणि सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकत नाही. त्यासाठी सरकारने सब्सिडी द्यावी अशी मागणी आंदोलन करणाऱ्या लोकांनी केली आहे.  

पाकिस्तानी लष्कर गिलगिट-बाल्टिस्तानमधील गरीब भागातील जमीन आणि संसाधनांवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा दावा करत आहे. जीबीमध्ये पाकिस्तान सरकार आणि लोकांमधील जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून आहे, परंतु २०१५ पासून हा वाद आणखी वाढला आहे. हा भाग पीओकेमध्ये असल्याने जमीन त्यांच्या मालकीची आहे असा स्थानिकांचा असा युक्तिवाद आहे. त्याच वेळी, प्रशासनाचे म्हणणे आहे की जी जमीन कोणालाही दिली गेली नाही, ती पाकिस्तान सरकारची आहे.

पाकिस्तानचे आर्थिक संकट आणि लोकांचा निषेधपाकची संपूर्ण जनता सध्या दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहे. देशात गहू, डाळी, साखर आदींचा मोठा तुटवडा असून, त्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानातील सरकार या भागातील लोकांशी भेदभावपूर्ण वागणूक देत आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआयची या भागात सत्ता आहे, त्यामुळे शाहबाज शरीफ यांचे सरकार जाणीवपूर्वक वस्तूंचा पुरवठा करू देत नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओके