शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'नरेंद्र मोदींनी भारताला ब्रँड बनवलं', पाकिस्तानी मीडियाकडून PM मोदी आणि भारताचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 18:17 IST

भारताने प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला मागं टाकलं, काश्मीरमधून कलम 370 हटवून भारतानं पाकिस्तानचा पराभव केला.

Pakistan on Narendra Modi: पाकिस्तानातील एका आघाडीच्या वृत्तपत्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच (Narendra Modi) जोरदार कौतुक केलं आहे. वृत्तपत्रानं म्हटलं की, नरेंद्र मोदींनापाकिस्तानमध्ये द्वेषानं पाहिलं जात असलं तरी त्यांनी भारताला एक ब्रँड बनवलं आहे. त्यांच्यापूर्वी हे कुणीही करू शकलेलं नाही. मोदींनी भारताला त्या मार्गावर आणलं आहे, जिथून भारताचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताचा दर्जा वाढलाय. वृत्तपत्रानेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचंही कौतुक केलं आहे.

भारतीय परराष्ट्र धोरणाचे खूप कौतुकपाकिस्तानतील आघाडीचं वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूननं आपल्या एका लेखात लिहिलं की, पीएम मोदींनी भारताला अशा टप्प्यावर आणलं आहे, जिथून देशाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे परराष्ट्र धोरण कार्यक्षमतेनं चालत असून त्याचा जीडीपी तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढला आहे. भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना प्रसिद्ध राजकीय, सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषक शहजाद चौधरी म्हणाले की, भारत हे गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आलंय. भारतानं पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर स्वतःचं क्षेत्र स्थापित केलं आहे.

रशियासोबतच्या मैत्रिवर प्रतिक्रियाचौधरी पुढे म्हणाले, युक्रेन युद्धामुळे रशियावर कठोर निर्बंध लादले गेले असतानाही भारताने रशियाकडून अनुदानित दराने तेल खरेदी करणे हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा विजय आहे. रशियावर अमेरिकेचे निर्बंध आहेत आणि भारताशिवाय कोणीही रशियाशी मुक्तपणे व्यापार करू शकत नाही. भारत स्वत:च्या अटींवर रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि परदेशात विकून डॉलरही कमावत आहे. जगातील दोन विरोधी लष्करी महासत्ता (अमेरिका आणि रशिया) भारताला आपला मित्र मानतात. 

भारताचे संपूर्ण जगाशी चांगले संबंधते पुढे लिहितात की, भारत संपूर्ण जगासाठी प्रासंगिक झाला आहे. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. 2037 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे त्याचे लक्ष्य आहे. भारताचा परकीय चलनाचा साठाही US $600 अब्जांपेक्षा जास्त आहे, तर पाकिस्तानकडे आता फक्त साडेचार अब्ज डॉलर शिल्लक आहेत. भारताकडे दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांची लष्करी क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. अब्जाधीशांच्या जागतिक यादीत 140 भारतीय आहेत, त्यापैकी चार टॉप 100 मध्ये आहेत.

भारत-पाकिस्तान संबंधांवर म्हणाले...चौधरी लिहितात, भारताने प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला मागं टाकलं आहे. दोन्ही देशांच्या विकासामध्ये एक खोल दरी निर्माण झालीये, जी कधीही भरून काढता येणार नाही. भारतानं जागतिक स्तरावर आपली छाप सोडलीये. ते G-7 चे अध्यक्ष आहेत आणि G-20 चे सदस्य देखील आहेत. यावर कोणाचा विश्वास असो वा नसो, भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवून पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या विचारसरणीत दिवाळखोरी आहे आणि त्यामुळेच ते बरबाद होत आहे. आपली अर्थव्यवस्था चांगली असेल तेव्हाच आपण चांगले काम करू शकतो, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत