शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 23:33 IST

पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, तालिबानने भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये तणाव वाढला. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तान एकटा पडल्याचे दिसले. तालिबाननेही त्यावेळी भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. दरम्यान, आता पाकिस्तान शेजारी असणाऱ्या देशांसोबत चांगले संबंध ठेवत असल्याचे दिसत आहे.

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता पाकिस्तानने अफगाणिस्तानशी संबंध सुधारण्याची घोषणा केली आहे. ते तालिबान सरकारशी राजनैतिक संबंध सुधारणार असल्याची घोषणा पाकिस्तानने शुक्रवारी केली. यासोबतच पाकिस्तान अफगाणिस्तानात आपला राजदूतही नियुक्त करणार आहे. 

तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले

२०२१ मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर कब्जा केला तेव्हा पाकिस्तानने शांतपणे त्याचे कौतुक केले. तालिबान सरकार त्यांच्या सुरक्षेच्या चिंता दूर करेल, अशी अपेक्षा पाकिस्तानला होती. पण त्याच्या उलट घडले. तालिबान राजवटीत, पाकिस्तानी सीमेवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवाद्यांचे हल्ले अनेक पटींनी वाढले आहेत, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने तालिबानवर टीटीपी बंडखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

चीनने मध्यस्ती केली

चीनच्या मध्यस्थीने या महिन्यात बीजिंगमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा राजकीय संबंध पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील मतभेद सोडवण्यात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.

यापूर्वी, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही एप्रिलमध्ये काबूलला भेट दिली होती. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानी मंत्र्यांचा हा पहिलाच अफगाणिस्तान दौरा होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत