शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:33 IST

पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली; म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी

लंडन/इस्लामाबाद : पाकिस्तानने गतकाळात अतिरेकी संघटनांना पाठिंबा दिला व त्याचा आम्हाला खूप त्रास भोगावा लागत आहे, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुत्तो-झरदारी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. पाश्चिमात्य देशांच्या गैरकृत्यांसाठी पाकिस्तानने  साथ दिली, असे त्या देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते. त्यावर बिलावल यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, पाकिस्तानचा दहशतवादी गटांशी गतकाळात संबंध होता हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आमच्या देशाला खूप त्रास सहन करावा लागला तसेच दहशतवादाचे तडाखेही बसले. आमच्या समाजाचे इस्लामीकरण, सैनिकीकरण झाले. मात्र या गोष्टींतून पाकिस्तान काही धडे शिकला. त्यानंतर आम्ही अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या. माझी आई व माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. पाकिस्तानाच्या इतिहासात अशा गोष्टी घडल्या असून, दुर्दैवाने तो आमच्या इतिहासाचा एक भाग आहे.

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पाकिस्तानचे पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील, असे बिलावल भुत्तो-झरदारी यांनी यापूर्वी म्हटले होते. त्याबद्दल ते म्हणाले की, रक्तपातासाठी चिथावणीचा माझा हेतू नव्हता. सिंधू नदीचे पाणी भारताने अडवले तर ती युद्धजन्य कृती मानली जाईल, असे पाकिस्तान सरकारने म्हटले होते. युद्ध म्हटले की रक्तपात अटळ असतो. आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी आहे. त्यासाठी भारताशी आम्ही कायम संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. (वृत्तसंस्था)

बंकरमध्येच आता भरते शाळा

जम्मू : हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाचे परिणाम आता नियंत्रण रेषेलगत (एलओसी) असलेल्या भागांतील शिक्षणावरही दिसू लागले आहेत. अनेक गावांमधील शाळांचे वर्ग आता बंकरमध्ये भरविले जात आहेत.

दुर्गम कुपवाडा जिल्हा हा सीमेलगतचा एक प्रमुख जिल्हा आहे. तिथे पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून गोळीबार सुरू ठेवला आहे. त्यामुळे तेथील सरकारी शाळेने तळमजल्यावरील वर्ग बंद केले. इयत्ता ६वी ते १०वी इयत्तेचे वर्ग शाळेच्या परिसरात असलेल्या भूमिगत बंकरची सफाई करून तिथेच भरवले जात आहेत.

२०१२ मधील पुरामुळे बंकरच्या प्रवेशद्वाराजवळ चिखल आणि माती साचली होती, परंतु आता तो परिसर स्वच्छ करण्यात आला. या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच हल्ल्याच्या वेळी काय हालचाली कराव्यात याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

जर शाळेची घंटा वाजली, तर विद्यार्थ्यांनी लगेच वर्गातून बाहेर पडून बंकरमध्ये लपावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. येथील अनेक शाळांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.

पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या मदतीला

भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना पाकिस्तान वाघा सीमेवरून मायदेशात येण्याची परवानगी देणार आहे. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे अनेक नागरिक भारतात अडकले आहेत.

भारत सरकारने निश्चित केलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर गुरुवारी ७० पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर अडकले.  भारतीय अधिकारी आमच्या नागरिकांना सीमापार करण्याची परवानगी देत असतील तर आम्ही त्यांचा स्वीकार करण्यास तयार आहोत. पाक नागरिकांसाठी वाघा सीमा खुली राहील.

‘नोकरी नको, भरपाई नको, शहीद म्हणून जाहीर करा’

हल्ल्याला दहा दिवस झाले असतानाही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी व्यथा हल्ल्यात पतीला गमावलेल्या आशन्या द्विवेदी यांनी गुरुवारी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मला कोणतीही नोकरी किंवा भरपाई नको. हल्ल्यात मरण पावलेल्या शुभम यांना शहीद म्हणून घोषित करा इतकीच माझी मागणी आहे.

आशन्या म्हणाल्या की, मी पुन्हा कधीही काश्मीरला जाणार नाही. शुभमचा फोटो आणि त्याने त्या दिवशी घातलेला शर्ट पाहात मी तासनतास खोलीतच बसते. एखाद्या टायरच्या फुटण्याचा आवाज जरी झाला, तरीही भीतीने मला कापरे भरते. राहुल गांधींनी नुकतीच आशन्या यांची भेट घेत त्यांचे "सांत्वन केले होते.

पाकिस्तानी महिलेसोबत विवाह; जवानाची  चौकशी

पाकिस्तानी नागरिक असलेल्या मीनल खान यांच्याशी सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या मुनीर खान या जवानाने विभागाची परवानगी न घेता विवाह केल्याने त्याची चौकशी होणार आहे. त्याच्या पत्नीला मंगळवारी वाघा सीमेवर पाठविण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची पाकिस्तानात होणारी रवानगी स्थगित करण्यात आली. व्हिसा संपल्यावरही भारतात वास्तव्य करून असल्याची बाब लपवण्याचा जवानावर आरोप आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत