शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:33 IST

पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली; म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी

लंडन/इस्लामाबाद : पाकिस्तानने गतकाळात अतिरेकी संघटनांना पाठिंबा दिला व त्याचा आम्हाला खूप त्रास भोगावा लागत आहे, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुत्तो-झरदारी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. पाश्चिमात्य देशांच्या गैरकृत्यांसाठी पाकिस्तानने  साथ दिली, असे त्या देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते. त्यावर बिलावल यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, पाकिस्तानचा दहशतवादी गटांशी गतकाळात संबंध होता हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आमच्या देशाला खूप त्रास सहन करावा लागला तसेच दहशतवादाचे तडाखेही बसले. आमच्या समाजाचे इस्लामीकरण, सैनिकीकरण झाले. मात्र या गोष्टींतून पाकिस्तान काही धडे शिकला. त्यानंतर आम्ही अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या. माझी आई व माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. पाकिस्तानाच्या इतिहासात अशा गोष्टी घडल्या असून, दुर्दैवाने तो आमच्या इतिहासाचा एक भाग आहे.

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पाकिस्तानचे पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील, असे बिलावल भुत्तो-झरदारी यांनी यापूर्वी म्हटले होते. त्याबद्दल ते म्हणाले की, रक्तपातासाठी चिथावणीचा माझा हेतू नव्हता. सिंधू नदीचे पाणी भारताने अडवले तर ती युद्धजन्य कृती मानली जाईल, असे पाकिस्तान सरकारने म्हटले होते. युद्ध म्हटले की रक्तपात अटळ असतो. आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी आहे. त्यासाठी भारताशी आम्ही कायम संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. (वृत्तसंस्था)

बंकरमध्येच आता भरते शाळा

जम्मू : हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाचे परिणाम आता नियंत्रण रेषेलगत (एलओसी) असलेल्या भागांतील शिक्षणावरही दिसू लागले आहेत. अनेक गावांमधील शाळांचे वर्ग आता बंकरमध्ये भरविले जात आहेत.

दुर्गम कुपवाडा जिल्हा हा सीमेलगतचा एक प्रमुख जिल्हा आहे. तिथे पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून गोळीबार सुरू ठेवला आहे. त्यामुळे तेथील सरकारी शाळेने तळमजल्यावरील वर्ग बंद केले. इयत्ता ६वी ते १०वी इयत्तेचे वर्ग शाळेच्या परिसरात असलेल्या भूमिगत बंकरची सफाई करून तिथेच भरवले जात आहेत.

२०१२ मधील पुरामुळे बंकरच्या प्रवेशद्वाराजवळ चिखल आणि माती साचली होती, परंतु आता तो परिसर स्वच्छ करण्यात आला. या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच हल्ल्याच्या वेळी काय हालचाली कराव्यात याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

जर शाळेची घंटा वाजली, तर विद्यार्थ्यांनी लगेच वर्गातून बाहेर पडून बंकरमध्ये लपावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. येथील अनेक शाळांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.

पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या मदतीला

भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना पाकिस्तान वाघा सीमेवरून मायदेशात येण्याची परवानगी देणार आहे. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे अनेक नागरिक भारतात अडकले आहेत.

भारत सरकारने निश्चित केलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर गुरुवारी ७० पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर अडकले.  भारतीय अधिकारी आमच्या नागरिकांना सीमापार करण्याची परवानगी देत असतील तर आम्ही त्यांचा स्वीकार करण्यास तयार आहोत. पाक नागरिकांसाठी वाघा सीमा खुली राहील.

‘नोकरी नको, भरपाई नको, शहीद म्हणून जाहीर करा’

हल्ल्याला दहा दिवस झाले असतानाही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी व्यथा हल्ल्यात पतीला गमावलेल्या आशन्या द्विवेदी यांनी गुरुवारी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मला कोणतीही नोकरी किंवा भरपाई नको. हल्ल्यात मरण पावलेल्या शुभम यांना शहीद म्हणून घोषित करा इतकीच माझी मागणी आहे.

आशन्या म्हणाल्या की, मी पुन्हा कधीही काश्मीरला जाणार नाही. शुभमचा फोटो आणि त्याने त्या दिवशी घातलेला शर्ट पाहात मी तासनतास खोलीतच बसते. एखाद्या टायरच्या फुटण्याचा आवाज जरी झाला, तरीही भीतीने मला कापरे भरते. राहुल गांधींनी नुकतीच आशन्या यांची भेट घेत त्यांचे "सांत्वन केले होते.

पाकिस्तानी महिलेसोबत विवाह; जवानाची  चौकशी

पाकिस्तानी नागरिक असलेल्या मीनल खान यांच्याशी सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या मुनीर खान या जवानाने विभागाची परवानगी न घेता विवाह केल्याने त्याची चौकशी होणार आहे. त्याच्या पत्नीला मंगळवारी वाघा सीमेवर पाठविण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची पाकिस्तानात होणारी रवानगी स्थगित करण्यात आली. व्हिसा संपल्यावरही भारतात वास्तव्य करून असल्याची बाब लपवण्याचा जवानावर आरोप आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत