शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:26 IST

पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे.

संयुक्त राष्ट्रे :  पाकिस्तान हा देश कट्टरपंथी असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) सातत्याने कर्जे घेण्याची नामुष्की त्याच्यावर आली आहे, अशी टीका भारताने केली आहे. सीमेच्या पलीकडून दुसऱ्या देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशांना त्याची अतिशय मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे, असेही भारताने म्हटले.सध्या पाकिस्तान हा १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचा २०२५-२६ कालावधीसाठी अस्थायी सदस्य आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत बहुपक्षीय सहकार्य व शांततामय मार्गाने वादांवर तोडगा काढणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करणे या विषयावरील खुल्या चर्चासत्रात भारताने ही मते व्यक्त केली.पाकिस्तानने या चर्चासत्रात जम्मू-काश्मीर, सिंधू जलवाटप कराराचा मुद्दा उपस्थित केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार तात्पुरता स्थगित केला आहे. पाकिस्तान जोवर सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे थांबवत नाही तोवर हा करार स्थगित राहील, अशी ठाम भूमिका भारताने घेतली. या चर्चेत तुर्कस्थाननेही जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरुपी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी सांगितले की, भारतीय उपखंडात एकीकडे भारत हा लोकशाही देश, त्याची विकसित होत असलेली अर्थव्यवस्था, तर दुसरीकडे कट्टरतावाद, दहशतवादात बुडालेला पाकिस्तान, असे विरोधाभासी चित्र आहे. (वृत्तसंस्था) 

पाकसाठी भारताने हवाई हद्दबंदी आणखी वाढवलीकेंद्र सरकारने पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द आणखी एका महिन्यासाठी म्हणजे २४ ऑगस्टपर्यंत बंद केली आहे. २६ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ३० एप्रिलपासून पाकिस्तानी विमान कंपन्या, त्यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या किंवा चालवलेल्या तसेच लष्करी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेशबंदी केली होती.नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस टू एअरमन (एनओटीएएम) २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि धोरणात्मक विचारानुसार ठेवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.‘पाकिस्तानने इतरांना नैतिकतेचे धडे देऊ नये’पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला नैतिकतेचे धडे देऊ नये. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ