शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:26 IST

पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे.

संयुक्त राष्ट्रे :  पाकिस्तान हा देश कट्टरपंथी असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) सातत्याने कर्जे घेण्याची नामुष्की त्याच्यावर आली आहे, अशी टीका भारताने केली आहे. सीमेच्या पलीकडून दुसऱ्या देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशांना त्याची अतिशय मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे, असेही भारताने म्हटले.सध्या पाकिस्तान हा १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचा २०२५-२६ कालावधीसाठी अस्थायी सदस्य आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत बहुपक्षीय सहकार्य व शांततामय मार्गाने वादांवर तोडगा काढणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करणे या विषयावरील खुल्या चर्चासत्रात भारताने ही मते व्यक्त केली.पाकिस्तानने या चर्चासत्रात जम्मू-काश्मीर, सिंधू जलवाटप कराराचा मुद्दा उपस्थित केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार तात्पुरता स्थगित केला आहे. पाकिस्तान जोवर सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे थांबवत नाही तोवर हा करार स्थगित राहील, अशी ठाम भूमिका भारताने घेतली. या चर्चेत तुर्कस्थाननेही जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरुपी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी सांगितले की, भारतीय उपखंडात एकीकडे भारत हा लोकशाही देश, त्याची विकसित होत असलेली अर्थव्यवस्था, तर दुसरीकडे कट्टरतावाद, दहशतवादात बुडालेला पाकिस्तान, असे विरोधाभासी चित्र आहे. (वृत्तसंस्था) 

पाकसाठी भारताने हवाई हद्दबंदी आणखी वाढवलीकेंद्र सरकारने पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द आणखी एका महिन्यासाठी म्हणजे २४ ऑगस्टपर्यंत बंद केली आहे. २६ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ३० एप्रिलपासून पाकिस्तानी विमान कंपन्या, त्यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या किंवा चालवलेल्या तसेच लष्करी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेशबंदी केली होती.नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस टू एअरमन (एनओटीएएम) २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि धोरणात्मक विचारानुसार ठेवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.‘पाकिस्तानने इतरांना नैतिकतेचे धडे देऊ नये’पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला नैतिकतेचे धडे देऊ नये. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ