शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

Pakistan Bilawal Bhutto on India : भुट्टो म्हणाले, “भारतासोबतचे संबंध संपवून फायदा होणार नाही”; पाकिस्तानशी संबंध पुन्हा सुधारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 22:10 IST

Bilawal Bhutto On India Pakistan Relation: पाकिस्तानच्या नव्या सरकारला भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. अगोदरच नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तसे संकेत दिले आहेत आणि आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे वक्तव्यही तसेच आहे.

Bilawal Bhutto On India Pakistan Relation: इम्रान खान यांच्या कार्यकाळात बिघडलेले भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी आपल्या वक्तव्यात हे संकेत दिले आहेत. गुरुवारी बिलावल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचले.

पाकिस्तानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बिलावल भुट्टो यांनी भारतासोबतचे संबंध पुन्हा सुधारण्यावर भर दिला. “पाकिस्तान आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे. भारतासोबतचे संबंध तोडणे देशाच्या हिताचे नाही,” असे भुट्टो यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकाकी पडल्याबद्दल बिलावल भुट्टो यांनी यापूर्वी सत्तेत असलेल्या इम्रान खान सरकारला जबाबदार धरले. आम्हाला वारशात असा एक देश मिळालाय जो चहुबाजूंनी संकंटांनी घेरलेला असल्याचेही म्हणत त्यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला.काय फायदा होईल?“जर पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री म्हणून मी भारत सरकार किंवा तेथील नागरिकांशी चर्चा केली नाही, तर पाकिस्तानचा हेतू पूर्ण होईल का? भारतासोबतचे संबंध तोडून पाकिस्तानला फायदा होईल का,” असा सवालही बिलावल भुट्टो यांनी उपस्थितांना केला. भारतासोबत संबंध पुन्हा प्रस्थापित करू नये असं लोक सांगतात. पाकिस्तानसाठी अशाप्रकारचं पाऊल उचलणं अयोग्य ठरेल. मी चांगल्या संबंधांना पाठिंबा देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कलम ३७० चा उल्लेखभारतासोबत आमचे अनेक प्रश्न आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध आणि संघर्षांचा मोठा इतिहास आहे. सध्याही दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. २०१९ च्या घटलेला हलक्यात घेता येणार नाही. जेव्हा जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला तेव्हा दोन्ही देशांमध्ये दरी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.शरीफ यांनीही केला होता उल्लेखयापूर्वी जून महिन्याच्या सुरूवातील पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासह अन्य देशांशी परस्पर सहकार्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतासह अन्य देशांसोबत भू आर्थिक रणनितीसाठी करार करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरImran Khanइम्रान खान