शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Pakistan Bilawal Bhutto on India : भुट्टो म्हणाले, “भारतासोबतचे संबंध संपवून फायदा होणार नाही”; पाकिस्तानशी संबंध पुन्हा सुधारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 22:10 IST

Bilawal Bhutto On India Pakistan Relation: पाकिस्तानच्या नव्या सरकारला भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. अगोदरच नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तसे संकेत दिले आहेत आणि आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे वक्तव्यही तसेच आहे.

Bilawal Bhutto On India Pakistan Relation: इम्रान खान यांच्या कार्यकाळात बिघडलेले भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी आपल्या वक्तव्यात हे संकेत दिले आहेत. गुरुवारी बिलावल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचले.

पाकिस्तानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बिलावल भुट्टो यांनी भारतासोबतचे संबंध पुन्हा सुधारण्यावर भर दिला. “पाकिस्तान आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे. भारतासोबतचे संबंध तोडणे देशाच्या हिताचे नाही,” असे भुट्टो यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकाकी पडल्याबद्दल बिलावल भुट्टो यांनी यापूर्वी सत्तेत असलेल्या इम्रान खान सरकारला जबाबदार धरले. आम्हाला वारशात असा एक देश मिळालाय जो चहुबाजूंनी संकंटांनी घेरलेला असल्याचेही म्हणत त्यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला.काय फायदा होईल?“जर पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री म्हणून मी भारत सरकार किंवा तेथील नागरिकांशी चर्चा केली नाही, तर पाकिस्तानचा हेतू पूर्ण होईल का? भारतासोबतचे संबंध तोडून पाकिस्तानला फायदा होईल का,” असा सवालही बिलावल भुट्टो यांनी उपस्थितांना केला. भारतासोबत संबंध पुन्हा प्रस्थापित करू नये असं लोक सांगतात. पाकिस्तानसाठी अशाप्रकारचं पाऊल उचलणं अयोग्य ठरेल. मी चांगल्या संबंधांना पाठिंबा देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कलम ३७० चा उल्लेखभारतासोबत आमचे अनेक प्रश्न आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध आणि संघर्षांचा मोठा इतिहास आहे. सध्याही दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. २०१९ च्या घटलेला हलक्यात घेता येणार नाही. जेव्हा जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला तेव्हा दोन्ही देशांमध्ये दरी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.शरीफ यांनीही केला होता उल्लेखयापूर्वी जून महिन्याच्या सुरूवातील पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासह अन्य देशांशी परस्पर सहकार्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतासह अन्य देशांसोबत भू आर्थिक रणनितीसाठी करार करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरImran Khanइम्रान खान