शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:06 IST

Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan Floods: सध्या उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जम्मू-काश्मी, उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये अनेक नद्यांना महापूर आला आहे. भारतासह पाकिस्तानातील पंजाब, सियालकोटमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अडीच लाख लोक विस्थापित झाले आहेत. सुमारे १,४३२ गावे पुरामुळे बाधित आहेत. पिके उद्ध्वस्त झाली असून, व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, अशा कठीण काळातही पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकतोय.

पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यात संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक विचित्र विधान केले. त्यांच्या मते, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्याने मृतदेह, गुरे आणि कचऱ्याचा ढीग पाकिस्तानात आला आहे. या ढिगाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा येत आहे. आसिफ पुढे म्हणाले की, सियालकोट हे जम्मूमधून निघणाऱ्या जलमार्गांच्या खाली आहे. जेव्हा जेव्हा भारत पाणी सोडतो, तेव्हा तिथे नियमित पूर येतो. मात्र, आसिफ यांनी हे देखील कबूल केले की नद्यांमध्ये पाणी सोडण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला दोनदा माहिती दिली होती.

सोशल मीडियावर ट्रोलख्वाजा आसिफ यांचे हे विधान पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांनी त्यांच्यावर टीका केली की, सरकार त्यांच्या तयारी आणि पायाभूत सुविधांच्या अपयशापासून लक्ष हटविण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी मंत्र्याने अजब दावा केला आहे. 

पाकिस्तानात ऐतिहासिक पूरपाकिस्तानी पाटबंधारे विभागाच्या मते, ३८ वर्षांत प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकाच वेळी तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सैन्य आणि मदत कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरriverनदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला