शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:06 IST

Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan Floods: सध्या उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जम्मू-काश्मी, उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये अनेक नद्यांना महापूर आला आहे. भारतासह पाकिस्तानातील पंजाब, सियालकोटमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अडीच लाख लोक विस्थापित झाले आहेत. सुमारे १,४३२ गावे पुरामुळे बाधित आहेत. पिके उद्ध्वस्त झाली असून, व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, अशा कठीण काळातही पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकतोय.

पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यात संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक विचित्र विधान केले. त्यांच्या मते, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्याने मृतदेह, गुरे आणि कचऱ्याचा ढीग पाकिस्तानात आला आहे. या ढिगाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा येत आहे. आसिफ पुढे म्हणाले की, सियालकोट हे जम्मूमधून निघणाऱ्या जलमार्गांच्या खाली आहे. जेव्हा जेव्हा भारत पाणी सोडतो, तेव्हा तिथे नियमित पूर येतो. मात्र, आसिफ यांनी हे देखील कबूल केले की नद्यांमध्ये पाणी सोडण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला दोनदा माहिती दिली होती.

सोशल मीडियावर ट्रोलख्वाजा आसिफ यांचे हे विधान पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांनी त्यांच्यावर टीका केली की, सरकार त्यांच्या तयारी आणि पायाभूत सुविधांच्या अपयशापासून लक्ष हटविण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी मंत्र्याने अजब दावा केला आहे. 

पाकिस्तानात ऐतिहासिक पूरपाकिस्तानी पाटबंधारे विभागाच्या मते, ३८ वर्षांत प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकाच वेळी तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सैन्य आणि मदत कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरriverनदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला