शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
3
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
6
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
7
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
10
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
11
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
12
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
13
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
14
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
15
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
16
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
17
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
18
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
19
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 22:31 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तान पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विचारमंथन करत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'सिंधू जल' करार स्थगित केला. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठं पाणी संकट आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने पाण्यावर विचारमंथन सुरू केले आहे. अलिकडच्या संघर्षात भारताकडून मोठा पराभव पत्करल्यानंतर, पाकिस्तान आपल्या संशोधकांच्या सल्ल्याने पाणी संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात कराची येथील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्सने 'भारत-पाकिस्तान संघर्ष' या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. पीआयआयएच्या अध्यक्षा डॉ. मासूमा हसन म्हणाल्या की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू जल करार रद्द केला आणि पाकिस्तानने १९७२ चा शिमला करार रद्द केला.

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; 73 वर्षांनंतर दारुवरील बंदी उठवली, यामुळे घेतला निर्णय...

"या संघर्षाबाबत सर्व घटकांचे, विशेषतः तरुणांचे आवाज ऐकले पाहिजेत. म्हणून आम्ही आमच्या संशोधन सहाय्यकांना चर्चेसाठी बोलावण्याचे ठरवले, मोहम्मद उस्मान, सय्यदा मलीहा सेहर, सफा रेहमत, सय्यद शहरयार शाह, आसिफ अली आणि साद असद ब्रोही यांसारखे प्रख्यात संशोधन सहाय्यक यात सहभागी झाले होते, अशी माहिती  डॉ. मासूमा हसन यांनी दिली.

'पुराचा धोका असू शकतो'

मोहम्मद उस्मान यांनी 'जल संपत्ती आणि संसाधने' या विषयावर संशोधन पत्र सादर केले. ते म्हणाले की , जर भारताने पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवला तर त्यांच्या स्वतःच्या वरच्या भागात पूर येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. "पण, जर त्यांनी उन्हाळ्यात आमचे पाणी थांबवले तर ते आमच्यासाठी चिंतेचे कारण असू शकते कारण पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि साठवणूक सर्वात महत्वाची आहे. याचा परिणाम आमच्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो, परिणामी उत्पादन कमी होईल,असंही ते म्हणाले.

मोहम्मद उस्मान म्हणाले, "जर भारताने आपले पाणी अडवले तर त्यांना मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची आवश्यकता असेल ज्या बांधण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील आणि अब्जावधी डॉलर्स लागतील. पाण्याचे 'शस्त्रीकरण' किंवा 'वॉटर बॉम्ब' बद्दल, जेव्हा वरच्या काठावरील देश पाण्याचा प्रवाह अडवतो आणि नंतर खालच्या काठावरील देशाला माहिती न देता अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडतो, तेव्हा त्यामुळे विनाशकारी पूर येतो, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर