शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 22:31 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तान पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विचारमंथन करत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'सिंधू जल' करार स्थगित केला. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठं पाणी संकट आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने पाण्यावर विचारमंथन सुरू केले आहे. अलिकडच्या संघर्षात भारताकडून मोठा पराभव पत्करल्यानंतर, पाकिस्तान आपल्या संशोधकांच्या सल्ल्याने पाणी संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात कराची येथील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्सने 'भारत-पाकिस्तान संघर्ष' या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. पीआयआयएच्या अध्यक्षा डॉ. मासूमा हसन म्हणाल्या की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू जल करार रद्द केला आणि पाकिस्तानने १९७२ चा शिमला करार रद्द केला.

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; 73 वर्षांनंतर दारुवरील बंदी उठवली, यामुळे घेतला निर्णय...

"या संघर्षाबाबत सर्व घटकांचे, विशेषतः तरुणांचे आवाज ऐकले पाहिजेत. म्हणून आम्ही आमच्या संशोधन सहाय्यकांना चर्चेसाठी बोलावण्याचे ठरवले, मोहम्मद उस्मान, सय्यदा मलीहा सेहर, सफा रेहमत, सय्यद शहरयार शाह, आसिफ अली आणि साद असद ब्रोही यांसारखे प्रख्यात संशोधन सहाय्यक यात सहभागी झाले होते, अशी माहिती  डॉ. मासूमा हसन यांनी दिली.

'पुराचा धोका असू शकतो'

मोहम्मद उस्मान यांनी 'जल संपत्ती आणि संसाधने' या विषयावर संशोधन पत्र सादर केले. ते म्हणाले की , जर भारताने पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवला तर त्यांच्या स्वतःच्या वरच्या भागात पूर येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. "पण, जर त्यांनी उन्हाळ्यात आमचे पाणी थांबवले तर ते आमच्यासाठी चिंतेचे कारण असू शकते कारण पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि साठवणूक सर्वात महत्वाची आहे. याचा परिणाम आमच्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो, परिणामी उत्पादन कमी होईल,असंही ते म्हणाले.

मोहम्मद उस्मान म्हणाले, "जर भारताने आपले पाणी अडवले तर त्यांना मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची आवश्यकता असेल ज्या बांधण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील आणि अब्जावधी डॉलर्स लागतील. पाण्याचे 'शस्त्रीकरण' किंवा 'वॉटर बॉम्ब' बद्दल, जेव्हा वरच्या काठावरील देश पाण्याचा प्रवाह अडवतो आणि नंतर खालच्या काठावरील देशाला माहिती न देता अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडतो, तेव्हा त्यामुळे विनाशकारी पूर येतो, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर