शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!  

By बाळकृष्ण परब | Updated: July 26, 2018 15:12 IST

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानमधील निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने बाजी मारली इम्रान अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. नवाझ शरीफ यांचा पीएमएल (एन), बिलावल भुत्तोंचा पीपीपी आणि इम्रानचा पीटीआय या पक्षांमध्ये झालेल्या त्रिकोणी लढाईत इम्रानचा पक्ष वरचढ ठरलाय. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.इम्रानचा जागतिक दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ते पाकिस्तानमधील प्रभावशाली राजकारणी बनण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीसारखाच धडाकेबाज राहिला आहे.  क्रिकेट खेळत असताना इम्रान हा त्याच्या सहकाऱ्यांमध्ये टीम लिडर म्हणून लोकप्रिय होता. त्याची खेळाडूंची पारख करण्याचे, आघाडीवर राहून नेतृत्व करण्याचे किस्से आजही क्रिकेटमध्ये रंगवून सांगितले जातात. राजकारणात उतरल्यावर हेच गुण त्याला उपयुक्त ठरले आणि तो अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला.

इम्रानचे व्यक्तिमत्त्व काहीसे रंगेल. अनेक महिलांशी असलेल्या त्याच्या संबंधाची अनेकदा चर्चा झाली. त्याचे वैवाहिक जीवनही तितकेच वादळी राहिले. मात्र पाकिस्तानी जनतेने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्याच्या सार्वजनिक जीवनातील वर्तनालाच अधिक महत्त्व दिले. कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईच्या स्मरणार्थ कॅन्सर रुग्णालय उभारून त्याने जनसेवेचा आदर्श निर्माण केला होता. पुढच्या काळाता पाकिस्तानी राजकारण भ्रष्टाचार आणि परिवारवादामध्ये गुंतल्यानंतर इम्रान हाच पाकिस्तानी जनतेसाठी आश्वासक चेहरा म्हणून पुढे आला.1992 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यानंतर 1996 मध्ये त्याने पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे इम्रानच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. मात्र 2013 साली खैबर पख्तुनख्वा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. इम्रानचे जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा त्याला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.आता इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही. इम्रान एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारताविरोधात जेवढ्या त्वेषाने खेळला तीच आक्रमकता तो पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून दाखवण्याची शक्यता आहे. विशेषतः पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे पाठबळ त्याच्या मागे असल्याने पाकिस्तानचे पंचप्राण असलेल्या या संस्थांना तो दुखावणार नाही. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली होती. पाकिस्तानकडून गेल्या 70 वर्षांत भारताला जे काही मिळाले, तेच यापुढेही मिळेल, असे मत तो सातत्याने मांडत होता. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर तो याची अंमलबजावणी करू शकतो. त्यातून सीमेवरील तणाव वाढणे, काश्मीरमधील अशांतता वाढणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे भारताला सध्यातरी इम्रानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकCricketक्रिकेटImran Khanइम्रान खान