शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!  

By बाळकृष्ण परब | Updated: July 26, 2018 15:12 IST

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानमधील निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने बाजी मारली इम्रान अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. नवाझ शरीफ यांचा पीएमएल (एन), बिलावल भुत्तोंचा पीपीपी आणि इम्रानचा पीटीआय या पक्षांमध्ये झालेल्या त्रिकोणी लढाईत इम्रानचा पक्ष वरचढ ठरलाय. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.इम्रानचा जागतिक दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ते पाकिस्तानमधील प्रभावशाली राजकारणी बनण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीसारखाच धडाकेबाज राहिला आहे.  क्रिकेट खेळत असताना इम्रान हा त्याच्या सहकाऱ्यांमध्ये टीम लिडर म्हणून लोकप्रिय होता. त्याची खेळाडूंची पारख करण्याचे, आघाडीवर राहून नेतृत्व करण्याचे किस्से आजही क्रिकेटमध्ये रंगवून सांगितले जातात. राजकारणात उतरल्यावर हेच गुण त्याला उपयुक्त ठरले आणि तो अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला.

इम्रानचे व्यक्तिमत्त्व काहीसे रंगेल. अनेक महिलांशी असलेल्या त्याच्या संबंधाची अनेकदा चर्चा झाली. त्याचे वैवाहिक जीवनही तितकेच वादळी राहिले. मात्र पाकिस्तानी जनतेने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्याच्या सार्वजनिक जीवनातील वर्तनालाच अधिक महत्त्व दिले. कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईच्या स्मरणार्थ कॅन्सर रुग्णालय उभारून त्याने जनसेवेचा आदर्श निर्माण केला होता. पुढच्या काळाता पाकिस्तानी राजकारण भ्रष्टाचार आणि परिवारवादामध्ये गुंतल्यानंतर इम्रान हाच पाकिस्तानी जनतेसाठी आश्वासक चेहरा म्हणून पुढे आला.1992 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यानंतर 1996 मध्ये त्याने पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे इम्रानच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. मात्र 2013 साली खैबर पख्तुनख्वा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. इम्रानचे जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा त्याला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.आता इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही. इम्रान एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारताविरोधात जेवढ्या त्वेषाने खेळला तीच आक्रमकता तो पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून दाखवण्याची शक्यता आहे. विशेषतः पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे पाठबळ त्याच्या मागे असल्याने पाकिस्तानचे पंचप्राण असलेल्या या संस्थांना तो दुखावणार नाही. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली होती. पाकिस्तानकडून गेल्या 70 वर्षांत भारताला जे काही मिळाले, तेच यापुढेही मिळेल, असे मत तो सातत्याने मांडत होता. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर तो याची अंमलबजावणी करू शकतो. त्यातून सीमेवरील तणाव वाढणे, काश्मीरमधील अशांतता वाढणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे भारताला सध्यातरी इम्रानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकCricketक्रिकेटImran Khanइम्रान खान