शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!  

By बाळकृष्ण परब | Updated: July 26, 2018 15:12 IST

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानमधील निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने बाजी मारली इम्रान अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. नवाझ शरीफ यांचा पीएमएल (एन), बिलावल भुत्तोंचा पीपीपी आणि इम्रानचा पीटीआय या पक्षांमध्ये झालेल्या त्रिकोणी लढाईत इम्रानचा पक्ष वरचढ ठरलाय. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.इम्रानचा जागतिक दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ते पाकिस्तानमधील प्रभावशाली राजकारणी बनण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीसारखाच धडाकेबाज राहिला आहे.  क्रिकेट खेळत असताना इम्रान हा त्याच्या सहकाऱ्यांमध्ये टीम लिडर म्हणून लोकप्रिय होता. त्याची खेळाडूंची पारख करण्याचे, आघाडीवर राहून नेतृत्व करण्याचे किस्से आजही क्रिकेटमध्ये रंगवून सांगितले जातात. राजकारणात उतरल्यावर हेच गुण त्याला उपयुक्त ठरले आणि तो अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला.

इम्रानचे व्यक्तिमत्त्व काहीसे रंगेल. अनेक महिलांशी असलेल्या त्याच्या संबंधाची अनेकदा चर्चा झाली. त्याचे वैवाहिक जीवनही तितकेच वादळी राहिले. मात्र पाकिस्तानी जनतेने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्याच्या सार्वजनिक जीवनातील वर्तनालाच अधिक महत्त्व दिले. कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईच्या स्मरणार्थ कॅन्सर रुग्णालय उभारून त्याने जनसेवेचा आदर्श निर्माण केला होता. पुढच्या काळाता पाकिस्तानी राजकारण भ्रष्टाचार आणि परिवारवादामध्ये गुंतल्यानंतर इम्रान हाच पाकिस्तानी जनतेसाठी आश्वासक चेहरा म्हणून पुढे आला.1992 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यानंतर 1996 मध्ये त्याने पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे इम्रानच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. मात्र 2013 साली खैबर पख्तुनख्वा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. इम्रानचे जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा त्याला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.आता इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही. इम्रान एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारताविरोधात जेवढ्या त्वेषाने खेळला तीच आक्रमकता तो पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून दाखवण्याची शक्यता आहे. विशेषतः पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे पाठबळ त्याच्या मागे असल्याने पाकिस्तानचे पंचप्राण असलेल्या या संस्थांना तो दुखावणार नाही. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली होती. पाकिस्तानकडून गेल्या 70 वर्षांत भारताला जे काही मिळाले, तेच यापुढेही मिळेल, असे मत तो सातत्याने मांडत होता. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर तो याची अंमलबजावणी करू शकतो. त्यातून सीमेवरील तणाव वाढणे, काश्मीरमधील अशांतता वाढणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे भारताला सध्यातरी इम्रानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकCricketक्रिकेटImran Khanइम्रान खान