शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

Pakistan Election Results: भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देणार, विजयानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 19:40 IST

निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे.

इस्लामाबाद - निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. उपखंडामध्ये समृद्धीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती होणे आवश्यक असल्याचे सांगत भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर संवाद साधताना इम्रान खान म्हणाले. जर आम्हाला या क्षेत्रातून गरिबी दूर करायची असेल, तर आम्हाला भारत आणि पाकिस्तामधील व्यापार वाढवला पाहिजे." यावेळी कायदे आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान आपल्याला बनवायचा आहे, असेही इम्रान यांनी सांगितले. यावेळी इतर पाकिस्तानी नेत्यांप्रमाणेच इम्रान यांनीही काश्मीर राग आळवला. "भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर हा सर्वात मोठा मुद्दा आहे. गेली 30 वर्षे काश्मिरी जनतेने बरेच काही सहन केले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवला पाहिजे. यावेळी बलुचिस्तानमध्ये जे काही होत आहे, त्यामागे भारताचा हात असल्याचे आम्हाला वाटते, असा आरोपही त्याने केला. मात्र या आरोप-प्रत्यारोपांना मागे टाकून आपण पुढे गेले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही दोन पावले पुढे येऊ असेही ते म्हणाले.  

 दरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमांनी आपल्याविषयी केलेल्या नकारात्मक प्रचाराबाबत इम्रान खान यांनी निराशा व्यक्त केली. भारतातील मीडियाने मला बॉलिवू़डमधील व्हिलनप्रमाणे दाखवले.  मात्र मी असा पाकिस्तानी आहे. जो क्रिकेटमुळे संपूर्ण भारत फिरलो आहे.  

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक