शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 22:20 IST

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे.

Pakistan Election: गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धूम सुरू आहे. काल रात्र आणि आज दिवसभरापासून सुरू असलेली मतमोजणी अंतिम टप्प्यात असून इम्रान खान यांच्या पक्षासोबतच नवाझ शरीफ यांनीही आपल्या पक्षाच्या विजयाचे मोठे दावे केले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांनी सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. 

मतमोजणीदरम्यान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. इम्रान खान यांच्या पक्षावर निवडणूक आयोगाने बंदी घातल्यामुळे बहुतांश उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता पाकिस्तानचे भविष्य अपक्षांच्या हाती असणार आहे.

अपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्ननवाझ शरीफ यांनी शुक्रवारी लाहोरमध्ये समर्थकांना संबोधित करताना म्हटले की, आम्ही सर्व पक्ष जनादेशाचा आदर करतो. देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे. देशात नवीन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी अपक्ष आणि इतर पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला कोणाशीही लढायचे नाही, पाकिस्तान सध्या कोणाशीही लढण्याच्या स्थितीत नाही. आम्ही आमचे शेजारी आणि जगातील इतर देशांशी संबंध सुधारू, असंही ते यावेळी म्हणाले.

शेहबाज शरीफ यांच्यावर जबाबदारी

ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांशी चर्चा करत आहोत. मी शेहबाज शरीफ यांना आसिफ झरदारी, मौलाना फजल उर रहमान आणि एमक्यूएम नेत्यांना सरकार स्थापन करण्यासाठी भेटण्यास सांगितले आहे. पाकिस्तानला किमान 10 वर्षे स्थिरतेची गरज आहे. जे लोक संघर्षाच्या मनस्थितीत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणतेही युद्ध नको आहे. पाकिस्तान हे सहन करू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र बसून प्रश्न सोडवले पाहिजेत आणि पाकिस्तानला 21 व्या शतकात नेले पाहिजे. ही फक्त माझी किंवा इशाक दार यांची जबाबदारी नाही. हा सगळ्यांचा पाकिस्तान आहे. आपण सर्वांनी एकत्र काम केले तरच पाकिस्तान या संकटातून बाहेर पडू शकेल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानElectionनिवडणूकInternationalआंतरराष्ट्रीयNawaz Sharifनवाज शरीफImran Khanइम्रान खान