शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुरहान वानी टपाल तिकिटावर, दहशतवाद्यांचा 'शहीद' म्हणून गौरव; पाकिस्तानचं शेपूट वाकडंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 11:39 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत.

इस्लामाबादः 'हम नही सुधरेंगे' हेच पाकिस्तानच ब्रीद असल्याचं त्यांच्या टपाल खात्यानं पुन्हा दाखवून दिलं आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचंच दर्शन घडवलं आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. त्यांचा हा पवित्रा आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. परंतु, उशिरा का होईना, शहाणपण सुचलं बुवा, अशी प्रतिक्रिया भारतीय व्यक्त करताहेत. या पत्राची बातमी येऊन काही तास उलटत नाहीत, तोच पाकिस्तानच्या टपाल खात्याने छापलेली २० नवी तिकिटं समोर आली आहेत. त्यावर जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आहेत. त्यांचा उल्लेख पीडित असा करून त्यांनी आपला भारतद्वेष पुन्हा दाखवला आहे. 

काश्मीरमधील जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीपासून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या हेतूने ही तिकिटं छापल्याचं टपाल खात्याच्या एका अधिकाऱ्यानं इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं. ८ जुलै २०१६ रोजी अनंतनागमधील चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख या तिकिटावर 'फ्रीडम आयकॉन' असा केला आहे. रासायनिक शस्त्रांचा वापर, पॅलेट गनचा वापर, सामूहिक कब्र असे शब्दही या तिकिटांवर आहेत. भारतीय लष्कर काश्मीरमधील जनतेवर किती अत्याचार करतंय, असा आभास त्यातून निर्माण करायचा आहे. 

परंतु, भारताला बदनाम करण्याची ही खेळी पाकिस्तानवरच उलटू शकते. दहशतवादाला खतपाणी घालण्याचं, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. आता दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं काढून त्यांनी स्वतःच आपल्या कुकर्मांची कबुली दिली आहे, स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर