शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

गडकरींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान भयभीत; जागतिक बँकेकडे घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 10:20 IST

पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर भारत पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल असा इशारा केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावर पाकिस्ताने वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे.

कराची - पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर भारतपाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल असा इशारा केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावर पाकिस्ताने वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे. दोन्ही देशातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने वर्ल्ड बँकेच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनची मागणी केली आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी पत्रकारांशी बोलताना सिंधू जल करारावरुन भारताने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या जल करारावर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र भारताकडून या कराराचं उल्लंघन करण्याची भाषा केली जात आहे. भारताकडून होत असलेल्या विधानांचा उल्लेख करत यावर वर्ल्ड बँकेने तोडगा काढावा अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. 

केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत बोलताना दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला लक्ष्य केले. गडकरी म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर भारत सिंधू जल करार मोडून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल. सिंधू जल करारामध्ये अनेक अटी आहेत. दोन्ही देशांमध्ये बंधुत्व वाढावे, शांता प्रस्थापित व्हावी आणि सहकार्य वाढवणे हे या करारामागचे उद्दिष्ट होते. परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.

जागतिक बँकेच्या पुढाकारातून भारत आणि पाकिस्तानने १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार हिमालयात उगम पावणाऱ्या आणि पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या सहा नद्यांपैकी व्यास, रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले, तर सिंधू, चिनाब आणि झेलम पश्चिमेकडील तीन नद्यांमधील पाण्याचा हक्क पाकिस्तानला मिळाला. यामध्ये भारताच्या वाट्याला ३३ दशलक्ष एकर-फूट, तर पाकिस्तानच्या वाट्याला ८० दशलक्ष एकर-फूट पाणी आले. हे वाटप समन्यायी नसल्याने, भरपाई म्हणून भारताला पाकिस्तानच्या वाट्याच्या तीन नद्यांमधील पाण्याचा सिंचनासाठी मर्यादित आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी अमर्यादित वापर करण्याचा अधिकार देण्यात आला. दुर्दैवाने भारताने आतापर्यंत स्वत:च्या वाट्याला आलेल्या पाण्याचाही पूर्णपणे वापर केला नाही. 

पुलवामा हल्ल्यानंतरही नितीन गडकरी यांनी पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सिंधू जल करार पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यावेळी भारताने पाणी अडवले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानकडूनही आली होती. मात्र जर भारताने पाणी रोखले तर पाकिस्तानची गोची होईल हे लक्षात आल्यानेच पाकिस्तानची पळापळ झाली आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानWorld Bankवर्ल्ड बँकWaterपाणी