शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

Video : पाकच्या ड्रायव्हरविना 117 प्रवाशांसह भारतात पोहोचली 'समझोता एक्सप्रेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:07 IST

इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान याांच्यातील संबंध दुरावले असल्याने समझोता एक्सप्रेसचा पाकिस्तानकडून थांबविण्यात आल्याचे वृत्त होते. आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी सुरु असलेल्या समझोता एक्सप्रेसला पाकिस्तानने थांबविले होते. अट्टारी येथून या ट्रेनला पुढे नेण्यासाठी भारताने त्यांचा ड्रायव्हर पाठवावा, अशी निरोप पाकिस्तानने दिला होता. या रेल्वेत एकूण 117 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 76 भारतीय आणि 41 पाकिस्तानी नागरिक होते. अखेर, समझोता एक्सप्रेस अट्टारी रेल्वे स्थानकावर पोहोचली.  

इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता. त्यामुळे, अखेर भारताने ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक पाठवून समझोता एक्सप्रेस भारतात आणली. दरम्यान, पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी समझोता एक्सप्रेसची सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच, ज्या नागरिकांनी तिकीट खरेदी केले आहे, त्यांनी विभागीय रेल्वे कार्यालयातून आपले पैसे परत घेऊन जावे, असेही म्हटले आहे. यापुढे केवळ ईदच्या सणालाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या रेल्वेच्या डब्ब्यांचा वापर करण्यात येणार आहे. 

22 जुलै 1976 साली समझोता एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती.  यापूर्वी बालाकोट येथील हल्ल्यानंतर सीमारेषेवरील तणावामुळे 26 फेब्रुवारी रोजी ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र, वातावरण पूर्वव्रत झाल्यानंतर सेवा सुरू करण्यात आली होती. या रेल्वेगाडीत 6 स्लीपर कोच आणि एक एसी 3 टियर कोच आहे. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कलम 370 आणि 35 ए हटविल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.  

पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर, आता भारत-पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांना जोडणारी समझोता एक्सप्रेसही पाकिस्तानकडून थांबविण्यात आली आहे. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिव्हिल अ‍ॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तैयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारतPakistanपाकिस्तानRailway Passengerरेल्वे प्रवासी