शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

Video : पाकच्या ड्रायव्हरविना 117 प्रवाशांसह भारतात पोहोचली 'समझोता एक्सप्रेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:07 IST

इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान याांच्यातील संबंध दुरावले असल्याने समझोता एक्सप्रेसचा पाकिस्तानकडून थांबविण्यात आल्याचे वृत्त होते. आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी सुरु असलेल्या समझोता एक्सप्रेसला पाकिस्तानने थांबविले होते. अट्टारी येथून या ट्रेनला पुढे नेण्यासाठी भारताने त्यांचा ड्रायव्हर पाठवावा, अशी निरोप पाकिस्तानने दिला होता. या रेल्वेत एकूण 117 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 76 भारतीय आणि 41 पाकिस्तानी नागरिक होते. अखेर, समझोता एक्सप्रेस अट्टारी रेल्वे स्थानकावर पोहोचली.  

इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता. त्यामुळे, अखेर भारताने ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक पाठवून समझोता एक्सप्रेस भारतात आणली. दरम्यान, पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी समझोता एक्सप्रेसची सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच, ज्या नागरिकांनी तिकीट खरेदी केले आहे, त्यांनी विभागीय रेल्वे कार्यालयातून आपले पैसे परत घेऊन जावे, असेही म्हटले आहे. यापुढे केवळ ईदच्या सणालाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या रेल्वेच्या डब्ब्यांचा वापर करण्यात येणार आहे. 

22 जुलै 1976 साली समझोता एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती.  यापूर्वी बालाकोट येथील हल्ल्यानंतर सीमारेषेवरील तणावामुळे 26 फेब्रुवारी रोजी ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र, वातावरण पूर्वव्रत झाल्यानंतर सेवा सुरू करण्यात आली होती. या रेल्वेगाडीत 6 स्लीपर कोच आणि एक एसी 3 टियर कोच आहे. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कलम 370 आणि 35 ए हटविल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.  

पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर, आता भारत-पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांना जोडणारी समझोता एक्सप्रेसही पाकिस्तानकडून थांबविण्यात आली आहे. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिव्हिल अ‍ॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तैयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारतPakistanपाकिस्तानRailway Passengerरेल्वे प्रवासी